Geeta Updesh: कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका! भगवान श्रीकृष्णाची ‘ही’ शिकवण आजही ठरते मोलाची
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh: कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका! भगवान श्रीकृष्णाची ‘ही’ शिकवण आजही ठरते मोलाची

Geeta Updesh: कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका! भगवान श्रीकृष्णाची ‘ही’ शिकवण आजही ठरते मोलाची

Jul 18, 2024 05:50 AM IST

Geeta Updesh In Marathi:भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे की, आपण केवळ आपले कार्य केले पाहिजे. त्याचं फळ काय मिळेल याचा विचार करू नये.

Geeta Updesh In Marathi
Geeta Updesh In Marathi

Geeta Updesh In Marathi: भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की, माणसाने कधीही त्याच्या कर्मावर शंका घेऊ नये. जर तुम्ही तुमच्या कामाकडे संशयाने पाहत असाल, नकारात्मक विचार करत असाल, तर तुम्हाला त्यात यश मिळणार नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्ही जे काही कराल ते पूर्ण आत्मविश्वासाने करा. तरच, तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाल, असे ते म्हणतात. याचा अर्थ भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्म करा, पण परिणामाची अपेक्षा करू नका. तुमच्या कर्मावर किंवा कामावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. आपले काम करत असताना तुमच्या मनात येणारे कोणतेही वाईट विचार तुम्हाला ध्येयापासून दूर ठेवतील.

तुमचे काम निर्भयपणे करा

महाभारताच्या युद्धादरम्यान भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की, कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी व्यक्तीने प्रथम त्याची भीती दूर केली पाहिजे. हे अर्जुना, निर्भयपणे युद्ध कर. युद्धात मेलास तर स्वर्ग मिळेल, पण जिंकलास तर पृथ्वीवर राज्य मिळेल. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की, तुमच्या मनातील भीती आधी काढून टाका. त्यामुळे कोणतेही काम निर्भयपणे करण्याची सवय लावून घ्या.

अति मोहामुळे दुःख येते

एखाद्या व्यक्तीने कोणत्याही गोष्टीशी जास्त संलग्न होऊ नये. कोणत्याही गोष्टीचा अधिकच मोह चुकीचा आहे. आसक्तीमुळे एखाद्याच्या पदरी दुःख आणि अपयश येऊ शकते. जास्त आसक्ती माणसामध्ये राग आणि दुःखाची भावना निर्माण करते. यामुळे व्यक्ती त्याच्या कर्मावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणूनच अती आसक्ती टाळली पाहिजे.

Good Morning Wishes: आठवड्याचा कोणताही वार असो, एक मेसेज पाठवा आणि सगळ्यांचाच दिवस आनंदमय करा!

क्रोध मनाचा नाश करतो

भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की, काम करताना मनावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जे काम करत आहात, त्यावर विश्वास ठेवणे आणि ते करताना राग न येणे हे खूप महत्वाचे आहे. क्रोध मनाचा नाश करतो. त्यामुळे केलेले काम बिघडते. त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

महाभारत युद्ध सुरू होण्याआधी, अर्जुनाने आपल्या नातेवाईकांना विरोधी गटात पाहिले आणि त्यांच्याशी युद्ध करण्यास तयार न होता धनुष्य खाली टाकले. मग, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश सांगितले. आजच्या युगातही भगवद्गीतेतील उक्ती आपल्या जीवनात लागू केल्यास आपले व्यक्तिमत्व सुधारते. गीता आपल्याला कसे जगायचे ते सांगते. तणाव, चिंता आणि व्यस्त जीवनात आपण शांतीचा मार्ग निवडू शकता.

Whats_app_banner