Geeta Updesh : जीवनात व्हाल एकाग्र आणि यशस्वी, नेहमी लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या 'या' गोष्टी!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : जीवनात व्हाल एकाग्र आणि यशस्वी, नेहमी लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या 'या' गोष्टी!

Geeta Updesh : जीवनात व्हाल एकाग्र आणि यशस्वी, नेहमी लक्षात ठेवा भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या 'या' गोष्टी!

Dec 12, 2024 07:59 AM IST

Geeta Updesh In Marathi : आम्ही तुम्हाला कृष्णाच्या अशा शिकवणी सांगणार आहोत, ज्याचा जीवनात आचरण करून तुम्ही लक्ष केंद्रित करू शकाल आणि यशस्वी व्हाल.

गीता उपदेश
गीता उपदेश

Geeta Teachings In Marathi : भगवान श्रीकृष्णांबद्दल असे म्हटले जाते की, एकदा ते आपल्या भक्तावर प्रसन्न झाले की, ते त्याला आयुष्यभर सोडत नाही. कृष्णाने गीतेद्वारे लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात या गोष्टींचा अवलंब केला तर, तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची चिंता वाटणार नाही. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून यश मिळवण्यातही यशस्वी व्हाल.

आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कृष्णाच्या अशा काही शिकवणी सांगणार आहोत, ज्याचा जीवनात आचरण करून तुम्ही लक्ष केंद्रित करू शकाल आणि यशस्वी व्हाल. चला तर मग जाणून घेऊया कृष्णाच्या 'त्या' शिकवणी... 

कृष्णाच्या प्रेरणादायी शिकवणी

१- गीता उपदेशातून अनुसरण करावी अशी पहिली गोष्ट म्हणजे माणसाने नेहमी त्याच्या वर्तमानात जगले पाहिजे. कारण काय झाले आणि काय झाले नाही याचा विचार करून उपयोग नाही. तुम्ही खूप विचार केल्याने तुमचा भूतकाळ किंवा भविष्यकाळ बदलणार नसतो. 

२- श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की, मनुष्याने परिणामाची इच्छा सोडून आपल्या कामात लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. त्यामुळे प्रत्येकाने सत्कर्म करत राहावे. तुम्ही जे काम कराल, देव त्याचे फळ निश्चित देईल. 

Geeta Updesh : 'ही' १ गोष्ट आहे मनुष्याच्या दुःखाचे कारण! भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करताना सांगितलं...

३- गीतेत भगवान श्री कृष्णाने म्हटले आहे की, तुम्ही जे मानता ते तुम्ही आहात. तुम्ही तेच बनता जे तुम्हाला विश्वास आहे की, तुम्ही बनू शकता. त्यामुळे मनात नेहमी चांगले विचार ठेवा. म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व देखील चांगले होईल. 

४- श्रीकृष्ण म्हणतात की, माणसाने आपल्या मनावर पूर्ण ताबा ठेवला पाहिजे. जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर आपले मन शत्रूसारखे काम करते. मनावर विजय मिळवला की सगळं काही साध्य करता येतं.

५- भगवान श्रीकृष्णाच्या मते, जो माणूस आसक्तीशिवाय, जे काही मिळेल त्यात समाधानी राहतो, जो काहीही न मिळाल्याने निराश होत नाही, तो ज्ञानी आहे. अशी व्यक्ति कधीच निराश होत नाही.

६- गीतेनुसार शांतता, नम्रता, मौन, आत्मसंयम आणि पवित्रता ही मनाची शिस्त आहे.

७- श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक संशय, दुविधा किंवा द्वंद्वात राहतात, त्यांना या लोकात किंवा परलोकात सुख मिळत नाही.

Whats_app_banner