Garud Puran : नरकात भोगावी लागते या २८ गुन्ह्यांची भयंकर शिक्षा, गरुड पुराणात आहे स्पष्ट उल्लेख
मराठी बातम्या  /  धर्म  /  Garud Puran : नरकात भोगावी लागते या २८ गुन्ह्यांची भयंकर शिक्षा, गरुड पुराणात आहे स्पष्ट उल्लेख

Garud Puran : नरकात भोगावी लागते या २८ गुन्ह्यांची भयंकर शिक्षा, गरुड पुराणात आहे स्पष्ट उल्लेख

Published Feb 08, 2025 10:06 AM IST

Garud Puran: जेव्हा पाक्षीराज गरुडाने भगवान श्री हरी विष्णूंना मरणोत्तर प्राण्यांची स्थिती, सजीवांचा प्रवास, विविध कर्मांतून मिळणारी फळे याविषयी प्रश्न विचारले तेव्हा भगवान श्री हरींनी त्यांची उत्तरे दिली.

नरकात भोगावी लागते या २८ गुन्ह्यांची भयंकर शिक्षा, गरुड पुराणात आहे स्पष्ट उल्लेख
नरकात भोगावी लागते या २८ गुन्ह्यांची भयंकर शिक्षा, गरुड पुराणात आहे स्पष्ट उल्लेख

Garud Puran: जेव्हा पाक्षीराज गरुडाने भगवान श्री हरिविष्णूंना मरणोत्तर प्राण्यांची स्थिती, जीवाचा यमलोकपर्यंतचा प्रवास, विविध कर्मांतून मिळणारी फळे याविषयी प्रश्न विचारले तेव्हा भगवान श्री हरींनी त्यांची उत्तरे दिली आणि उपदेश केला. गरुड पुराणात याचा उल्लेख आहे. गरुड पुराणातून जीवन आणि कर्म याविषयी बरेच काही शिकायला मिळते.

१८ पुराणांपैकी एक असलेल्या या महापुराणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे वैष्णव पुराण आहे. गरुड पुराणात भगवान श्री हरि विष्णूच्या चोवीस अवतारांचे वर्णन आहे. तसेच सर्व देवी-देवतांचा उल्लेख आढळतो.

गुरुड पुराणात जीवाच्या मृत्यूनंतर २८ गुन्हे व शिक्षा आहेत, ज्या त्याला नरकात भोगाव्या लागतात. इतरांच्या मालमत्तेवर कब्जा करणाऱ्यांना दरोडेखोरांकडून नरकात मारहाण केली जाते, असे म्हटले आहे. जे नवरा-बायको आपलं नातं प्रामाणिकपणे सांभाळत नाहीत, ते बेशुद्ध होईपर्यंत दोरीने घट्ट बांधले जातात. इतरांचे हक्क हिरावून घेणाऱ्यांना विषारी साप चावतात. जनावरे मारणाऱ्यांना गरम तेलात उकळले जाते. 

व्यवहार स्पष्ट ठेवा, उधारीचे पैसे पूर्ण परत करा

गरुड पुराणात असा आदेश देण्यात आला आहे की, जर तुम्ही कोणाशी व्यवहार करत असाल तर त्यामध्ये स्पष्ट असावे. उधार घेतलेले पैसे पूर्ण पणे परत करा. माणसाने आपल्या आरोग्याबाबत कधीही निष्काळजीपणा करू नये. वाईट सवयी टाळायला हव्यात. यज्ञ, पूजा, भोजन व इतर कारणांसाठी अग्नी प्रज्वलित केल्यास त्यावर पूर्ण नियंत्रण असावे. ब्राह्मणाची हत्या करणे, पवित्र व्रते मोडणे, भ्रूणहत्या ही गंभीर पापे आहेत. 

स्त्रीची हत्या करणे, अत्याचार करणे हे गंभीर पाप

गरुड पुराणात स्त्रीची हत्या करणे, स्त्रीवर अत्याचार करणे, कोणाचा विश्वासघात करणे हे गंभीर पाप मानले आहे. पवित्र अग्नी, पवित्र जल, बाग किंवा गोठ्यात मलत्याग करून गायींची हत्या करणाऱ्यांना गरुड पुराणात कठोर शिक्षेचा उल्लेख आहे. गरुड पुराणाचे सार असे आहे की, आपण आसक्ती चा त्याग करून वैराग्य पत्करले पाहिजे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि धर्मनिरपेक्ष श्रद्धांवर आधारित आहे, जी केवळ सामान्य लोकहित लक्षात घेऊन मांडली गेली आहे.

Sunil Madhukar Tambe

eMail

Whats_app_banner