Dhanteras : आज धनत्रयोदशीला यमदीपदान का करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि कथा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Dhanteras : आज धनत्रयोदशीला यमदीपदान का करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि कथा

Dhanteras : आज धनत्रयोदशीला यमदीपदान का करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि कथा

Published Oct 29, 2024 11:15 AM IST

Dhantrayodashi 2024 Yamadeepdaan Muhurta : दरवर्षी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला यमदीप प्रज्वलित केला जातो. हा एकमेव विशेष दिवस आहे जेव्हा यमराजाची पूजा केली जाते. यमदीपदान का करतात? यमदीपदानाचा मुहूर्त, महत्व आणि कथा जाणून घ्या.

धनत्रयोदशीला यमदीपदान का करतात, यमदीपदानाचा मुहूर्त
धनत्रयोदशीला यमदीपदान का करतात, यमदीपदानाचा मुहूर्त

Dhanteras 2024 Yamadeepdaan Muhurta : आज मंगळवार २९ ऑक्टोबर २०२४ रोजी धनत्रयोदशी आहे. पाच दिवसीय दीपोत्सव महोत्सवाचा हा पहिला दिवस आहे. धन्वंतरी देव आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सोन्या-चांदीसह काही वस्तूंच्या खरेदीसाठीही हा शुभ मुहूर्त मानला जातो. असे मानले जाते की यामुळे जीवनात धन-संपत्ती, सुख-समृद्धी येते. 

दरवर्षी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला यमदीप प्रज्वलित केला जातो. अकाली मृत्यूच्या भीतीपासून बचाव करण्यासाठी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी यमदीप प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. वर्षातील हा एकमेव दिवस आहे जेव्हा मृत्यूच्या देवाची पूजा केली जाते आणि यम दीप प्रज्वलित केला जातो. चला जाणून घेऊया धनत्रयोदशीला यमदीप प्रज्वलित करण्याची शुभ वेळ, योग्य पद्धत आणि कथा.

धनत्रयोदशीला यम दीप कधी लावावा?

धनतेरसच्या दिवशी २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटे ते ६ वाजून ५५ मिनिटे या वेळेत यप दीप प्रज्वलित करता येईल.

धनत्रयोदशीला दिवे दान करण्याची पद्धत :

घराची दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. त्यामुळे यमदीप दक्षिण दिशेला लावावा. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात यम दिवा लावावा. पिठाचा मोठा दिवा बनवा. स्वच्छ कापसापासून २ लांब वाती बनवा. दिव्यात वाती ठेवा आणि मोहरीचे तेल घाला आणि चार बाजूंनी दिवा लावा. कुंकू, अक्षत आणि फुलांनी दिव्याची पूजा करा. यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर तांदूळ किंवा गव्हावर दक्षिण दिशेला हा यमाच्या नावाने दीवा लावा. यानंतर ॐ यमदेवाय नमः जप करताना दक्षिण दिशेला नमस्कार करावा.

यमदीपदानाची पौराणिक कथा

एकदा यमराजांनी आपल्या दूतांना विचारले की, लोकांचे प्राण घेताना त्यांना दया येत नाही का? यावर यमदूतांनी नकारार्थी उत्तर दिले. यमराजांनी दूतांना सत्य सांगण्यास सांगितले. यावर यमदूतांनी सांगितले की, एकदा कुणाचातरी जीव घेताना त्यांचे मन भयभीत झाले होते.

हंस नावाचा राजा दुसऱ्या राज्यात शिकारीसाठी गेला होता. त्या राज्याचा राजा त्याचा खूप आदर करत असे. त्याच दिवशी राजाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. ज्योतिषशास्त्रानुसार, असे सांगण्यात आले होते की लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू होईल. हे ऐकून राजाने मुलाला गुहेत सोडले आणि लोकांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले.

काही काळानंतर एका मुलीने त्या ब्रह्मचारी मुलाशी गंधर्व म्हणून लग्न केले. लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला. यमदूतांनी सांगितले की त्या स्त्रीचा विलाप पाहून त्यांचे हृदय भरून आले. या घटनेनंतर यमराज म्हणाले की, धनत्रयोदशीच्या दिवशी विधीवत पूजा आणि दिवे दान केल्याने अकाली मृत्यू टाळता येतो. यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावाचा दिवा लावला जातो.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner