Buddha and Angulimala: कोण होता अंगुलीमाल दरोडेखोर? राजसत्तेला आव्हान देणाऱ्या अंगुलीमालने कसे टेकले बुद्धासमोर गुडघे?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Buddha and Angulimala: कोण होता अंगुलीमाल दरोडेखोर? राजसत्तेला आव्हान देणाऱ्या अंगुलीमालने कसे टेकले बुद्धासमोर गुडघे?

Buddha and Angulimala: कोण होता अंगुलीमाल दरोडेखोर? राजसत्तेला आव्हान देणाऱ्या अंगुलीमालने कसे टेकले बुद्धासमोर गुडघे?

Published Feb 12, 2025 03:37 PM IST

Buddha and Angulimala: भगवान गौतम बुद्ध आणि दरोडेखोर अंगुलीमालाची गोष्ट जगप्रसिद्ध आहे. सद्गुणांचा दुर्गुणावर झालेला विजयाची कथा आहे. भगवान बुद्धांनी आपल्या प्रतापाने एका खुनी दरोडेखोराला संत बनविले. हा अद्भुत चमत्कार कसा झाला ते वाचा…

 कोण होता अंगुलीमाल दरोडेखोर? राज्यसत्तेला आव्हान देणाऱ्या अंगुलीमालने टेकले बुद्धासमोर गुडघे
कोण होता अंगुलीमाल दरोडेखोर? राज्यसत्तेला आव्हान देणाऱ्या अंगुलीमालने टेकले बुद्धासमोर गुडघे

Buddha and Angulimala: तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित कथा, बोधकथा व्यक्तीच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवणाऱ्या आहेत. या कथांमधून व्यक्ती काहीना काही शिकत असते. अशीच एक जगप्रसिद्ध कहाणी आहे अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची.

आताच्या उत्तर प्रदेशात असलेल्या मगध नावाच्या राज्यात अंगुलीमाल नाव्याच्या दरोडेखोराची मोठी दहशत पसरलेली होती. तो लोकांना लुटण्याचे काम करत होता. लुटल्यानंतर तो त्यांची हत्या करत होता. हत्येनंतर मृत व्यक्तीचा हाताचा अंगठा कापून तो गळ्यातील माळेत विणत असे. यावरूनच या दरोडेखोराला अंगुलीमाल असे नाव पडलेले होते. अंगुलीमाल ज्या जंगलाच रहात होता, त्या जंगलाच्या आसपासच्या परिसारातील गावांमधील लोक त्रस्त होते. या दरोडेखोपासून आपली कशी सुटका होईल याची ते वाट पाहत होते. मगधाचा राजाही अंगुलीमाल दरोडेखोराला पकडण्यासाठी जंग जंग पछाडत होता. मात्र, अंगुलीमाल हाती लागत नव्हता.

अंगुलीमाल ज्या जंगलात रहात होता, त्याच्या जवळच्या गावात एकदा गौतम बुद्ध आले. गावातील लोकांनी बुद्धांचे स्वागत केले. त्यांचे आदरातिथ्य सुरू केले. त्यावेळी गावात अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची दहशत पसरली असल्याचे बुद्धांच्या लक्षात आले. बुद्धांनी गावकऱ्यांकडे अंगुलमालाबाबत विचारणा केली . त्यानंतर गावकऱ्यांनी अंगुलीमालाच्या दहशतीची हकिकत भागवान बुद्धांना ऐकवली.

दुसऱ्याच दिवशी गौतम बुद्ध त्या जंगलाच्या दिशेने जायला निघालेल. गावकऱ्यांनी त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. बुद्धांना येताना पाहून, दरोडेखोर अंगुलीमाल हातात तलवार घेऊन उभा राहिला, पण बुद्ध त्याच्या गुहेसमोरून गेले, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. दरोडेखोर अंगुलीमाल त्याच्या मागे धावला, परंतु दिव्य प्रभावामुळे तो बुद्धांना पकडू शकला नाही.

थकलेला आणि हारलेला अंगुलीमाल म्हणाला, "थांबा". बुद्ध थांबले आणि हसत म्हणाले- मी खूप आधी थांबलो आहे पण तुम्ही ही हिंसा कधी थांबवणार? अंगुलीमाल म्हणाला - संन्यासी, तू मला घाबरत नाहीस. संपूर्ण मगध मला घाबरतो. तुमच्याकडे जे काही आहे ते बाहेर काढा, नाहीतर तुमचा जीव जाईल. मी या राज्यातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. बुद्ध अजिबात घाबरले नाहीत आणि म्हणाले- तू या राज्यातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेस यावर मी कसा विश्वास ठेवू? तुला हे सिद्ध करावे लागेल.

अंगुलीमाल म्हणाला, "ते कसे सिद्ध करायचे ते मला सांगा?" बुद्ध म्हणाले, "तू त्या झाडाची दहा पाने तोडून माझ्याकडे आण." अंगुलीमाला म्हणाला - फक्त एवढेच, "मी संपूर्ण झाड उपटून टाकू शकतो". अंगुलीमालाने दहा पाने तोडली आणि आणली. बुद्ध म्हणाले- आता जा आणि ही पाने परत झाडावर लावा.

अंगुलीमाला आश्चर्यचकित झाली आणि विचारले, "तुटलेली पाने कधी परत जोडता येतात का?" तर बुद्ध म्हणाले - जर तू इतकी छोट्याशा गोष्टीला पुन्हा जोडू शकत नाहीस तर तू सर्वात शक्तिशाली कसा?

अंगुलीमाल दरोडेखोर भिक्षू बनला

जर तू एखाद्या गोष्टीला जोडू शकत नसशील तर किमान ते तोडू नका, जर तू एखाद्याला जीवन देऊ शकत नसशील तर त्याला मृत्यू देण्याचाही तुला अधिकार नाही. हे ऐकून अंगुलीमालाला त्याची चूक कळली आणि तो बुद्धाचा शिष्य बनला. आणि त्याच गावात राहून तो लोकांची सेवा करू लागला. पुढे, हाच अंगुलीमाल एक महान संत झाला आणि अहिंसक या नावाने प्रसिद्ध झाला. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की माणूस कितीही वाईट असला तरी तो बदलू शकतो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Sunil Madhukar Tambe

eMail

Whats_app_banner