भारताने समोवारी रांची कसोटी सामन्यात ५ विकेट्सनी विजय मिळवला. टीम इंडियाने १९२ धावांचे लक्ष्य ५ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. या विजयासह भारताने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
(1 / 4)
यानंतर आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. शुभमन गिल (५२*) आणि ध्रुव जुरेल (३९*) यांच्यातील ७२ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
(2 / 4)
भारत दुसऱ्या स्थानावर कायम - भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२३-२५ सायकलमध्ये आपला ८ वा सामना खेळला आणि पाचव्या विजयाची नोंद केली. इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकूनही भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. भारताचे ६२ गुण असून त्याची टक्केवारी ६४.५८ आहे.
(3 / 4)
इंग्लंडची अवस्था वाईट - त्याचबरोबर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला या पराभवाचा मोठा फटका बसला आहे. इंग्लंडचा संघ WTC गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडचा ९ सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. त्यांचे गुण २१ आहेत तर त्यांची टक्केवारी २१.८७ आहे. या WTC सायकलमध्ये इंग्लंडला टॉप-२ मध्ये पोहोचणे कठीण झाले आहे.
(4 / 4)
न्यूझीलंड अव्वल स्थानावर - डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर न्यूझीलंडचे वर्चस्व कायम आहे. किवी संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ जिंकले आहेत. न्यूझीलंडचे ३६ गुण आणि टक्केवारी ७५ आहेत.
(5 / 4)
ऑस्ट्रेलियन संघ १० सामन्यांत ६ विजय नोंदवत तिसऱ्या स्थानावर आहे. कांगारू संघाचे ६६ गुण असून त्यांची टक्केवारी ५५ आहे. बांगलादेशचा संघ दोनपैकी एक सामना जिंकून चौथ्या स्थानावर आहे. यानंतर पाकिस्तान पाचव्या नंबरवर आहे.