बंगळुरू कसोटीत भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. पण पहिल्या डावात ते केवळ ४६ धावांत गारद झाले. याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ४०२ धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर न्यूझीलंडला ३५६ धावांची मोठी आघाडी मिळाली. मात्र, यानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात शानदार पलटवार केला, पण पराभव टाळता आला नाही.
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचे काही खेळाडू सुपर फ्लॉप ठरले. अशा ५ खेळाडूंबाबत आपण येथे जाणून घेणार आहोत.
(AFP)मोहम्मद सिराज- टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची कामगिरीही अगदी सामान्य होती. या सामन्यात तो महागडा ठरला आणि त्याला विकेटही घेता आली नाही. पहिल्या डावात त्याने १८ षटकात ८४ धावा दिल्या आणि २ बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने ७ षटकात १६ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.
केएल राहुल - या सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुलची बॅट पूर्णपणे शांत राहिली. जेव्हा त्यांची नितांत गरज होती, त्यावेळी तो फ्लॉप ठरला. पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला तर दुसऱ्या डावात राहुलने केवळ १२ धावा केल्या.
रवींद्र जडेजा- स्टार आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा फलंदाजीत फ्लॉप ठरला. जेव्हा त्यांची नितांत गरज होती. त्यावेळी त्याची बॅट शांत राहिली. जडेजा पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. दुसऱ्या डावात केवळ ५ धावा करता आल्या. गोलंदाजीतही त्याने फारशी कामगिरी केली नाही. रवींद्र जडेजाला दोन्ही डावांत मिळून केवळ ३ विकेट घेता आल्या.
यशस्वी जैस्वाल- या सामन्याच्या दोन्ही डावात भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालही फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या डावात १३ धावा केल्या. जैस्वाल दुसऱ्या डावात चांगलाच खेळताना दिसत होता. मात्र ३५ धावांवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. भारताला दुसऱ्या डावात त्याच्याकडून मोठ्या खेळीची गरज होती.
आर अश्विन- बंगळुरू कसोटीत अनुभवी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन बॅट आणि बॉल दोन्हीसह फ्लॉप ठरला. पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला तर दुसऱ्या डावात त्याने १५ धावा केल्या. संपूर्ण कसोटीत अश्विनने केवळ १ बळी घेतला आणि तो चांगलाच महागडा ठरला. पहिल्या डावात अश्विनने १६ षटकात ९४ धावा दिल्या, तर दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही.