राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नागरी नियुक्ती समारंभात पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाला पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. वैजयंतीमाला, भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी १९५०-६०च्या दशकात भारतीय पडद्यावर राज्य केले. ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘आशा’, ‘साधना’, ‘गंगा जमुना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय दाखवला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नागरी नियुक्ती समारंभात पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाला पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. वैजयंतीमाला, भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी १९५०-६०च्या दशकात भारतीय पडद्यावर राज्य केले. ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘आशा’, ‘साधना’, ‘गंगा जमुना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय दाखवला.
जेव्हा वैजयंती माला अवघ्या १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. १९४९मध्ये त्यांनी 'वडकई' या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याचवेळी त्यांनी १९५१ साली 'बहार' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वैजयंतीमाला यांची आई वसुंधरा देवी या ४०च्या दशकातील प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री होत्या.
वैजयंती माला यांचे नाव अनेक दिग्गज कलाकारांशी जोडले गेले आहे. यामध्ये दिलीप कुमारपासून राज कपूरपर्यंत अनेक बड्या कलाकारांचा समावेश होता. मात्र, वैजयंतीमाला यांनी एका डॉक्टरला आपला जीवसाथी बनवले. वैजयंती माला यांना एकदा न्यूमोनिया झाला होता. त्यांच्यावर डॉ. चमनलाल बाली उपचार करत होते. बाली त्यांचे चाहते देखील होते. उपचार सुरू असतानाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि १० मार्च १९६८ रोजी त्यांचे लग्न झाले.