आरसीबीकडून या सामन्यात विराट कोहलीने ५९ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. किंग कोहलीने चिन्नास्वामीच्या मैदानावर ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. विराटने १४०.६८ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.
(AFP)आता तुम्ही म्हणाल की कोहलीने एक टोक धरून जबाबदार खेळी खेळली. पण कधी कधी क्रिकेटच्या खेळात स्कोअर बोर्ड सर्वच सत्य सांगत नाही तर सामन्याची परिस्थितीवरून सर्वकाही समजून घ्यावे लागते.
(AFP)डावाच्या शेवटच्या ५ षटकांमध्ये, जेव्हा फलंदाजांनी भरपूर चौकार आणि षटकार मारायला हवे होते, तेव्हा विराट वाईटरित्या संघर्ष करताना दिसला. शेवटच्या २१ चेंडूंमध्ये कोहलीच्या बॅटमधून एकच चौकार आला आणि तोही शेवटच्या षटकात.
(PTI)कोहलीची संथ खेळी महागात पडली? - सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत विराट कोहलीने आणखी एक दमदार खेळी खेळली यात शंका नाही. किंग कोहलीने वेगवान सुरुवातही केली होती. मात्र, जसजसा डाव पुढे सरकत गेला तसतसा कोहलीचा वेगही कमी होत गेला.
विशेषतः शेवटच्या षटकांमध्ये, विराटने खेळलेल्या शेवटच्या १६ चेंडूत केवळ २१ धावा केल्या. होय, फक्त २१ धावा. यावेळी किंग कोहली आपल्या होम ग्राऊंडवर आणि फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या मैदानावर चौकारांसाठी धडपडताना दिसला. विराटची अवस्था इतकी बिकट होती की त्याला या १६ चेंडूत फक्त एकच षटकार मारता आला.
(PTI)निवडकर्त्यांची कोहलीवर नजर- जर कोहलीने शेवटची षटके सुरुवातीसारखी त्याच गतीने खेळली असती तर आरसीबीच्या स्कोअर बोर्डवर २०० पेक्षा जास्त धावा झाल्या असत्या. आरसीबीच्या पराभवासाठी फक्त कोहलीच्या या खेळीला दोष देणे योग्य नाही, पण विराटला पॉवरप्लेनंतरच्या फलंदाजीवर आणि स्ट्राईक रेटवर काम करावे लागेल.