वास्तुशास्त्रानुसार कितीही वास्तूदोष असले तरी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक सोपे मार्ग आहेत. या समस्या अनेक प्रकारे सोडवल्या जाऊ शकतात. असं म्हटलं जातं की कुटुंबात समृद्धी वाढवण्याचे काही उपाय स्वयंपाकघरात आहेत. फक्त योग्य गोष्ट योग्य ठिकाणी ठेवण्याची गरज आहे! वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील विविध भांडी ठेवण्याची योग्य जागा जाणून घ्या.
स्वयंपाकघराचे तोंड कोणत्या दिशेला असावे-
वास्तूतज्ञ सांगतात, स्वयंपाकघराचे नेहमी पूर्व, उत्तर किंवा पश्चिमेकडे तोंड करावे. त्यामुळे कुटुंबात समृद्धी वाढते. नाना प्रकारची सुख-शांती येते. पण स्वयंपाकघराचे तोंड घराच्या कोणत्याही कोपऱ्याकडे नसावे याची काळजी घ्या असे वास्तू तज्ज्ञ सांगतात.
किचनमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू कुठे ठेवाव्यात -
वास्तू तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्वयंपाकघरात इलेक्ट्रॉनिक वस्तू एका विशिष्ट दिशेने ठेवणे चांगले. अशावेळी मायक्रोवेव्ह, टोस्टर, इलेक्ट्रॉनिक स्टोव्ह स्वयंपाकघराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे चांगले. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागते.
स्वयंपाकघरात तांदूळ आणि पीठ कसे ठेवावे -
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात तांदूळ आग्नेय दिशेला ठेवणे चांगले. तथापि, तांदूळ किंवा पीठ ठेवताना एक नियम पाळला पाहिजे. तांदूळ किंवा पीठ ठेवल्यावर ते प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नये, असं म्हणतात. त्याचा परिणाम कुटुंबातील वागणुकीवर होतो. तसेच, तांदूळ किंवा पीठ प्लास्टिकच्या पिशवीतही ठेवू नका. परिणामी, या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, स्वयंपाकघरात प्लास्टिकच्या डब्यांऐवजी तांदूळ किंवा पीठ स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवावे.
स्वयंपाकघरात या वस्तू संपू देऊ नका-
वास्तू तज्ज्ञांच्या मते, काही गोष्टी स्वयंपाकघरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हळद, मीठ, तांदूळ, मसाले हे पदार्थ संपण्याआधीच भरून ठेवावेत. जेणे करून एक दिवसही स्वयंपाकघरातून ते संपणार नाही.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.