राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात चढ-उतार होत असल्यामुळं त्याचा फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
Weather Update Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुलीवंदन साजरं केलं जात असतानाच आता मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
(HT)maharashtra rain news today : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि नंदूरबार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
(HT)उन्हाळ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे. कारण मका, गहू, हरभरा आणि फळबागांचं या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
(HT_PRINT)