Congress President Election : गांधी घराण्याशिवाय हे ११ नेते होते कॉंग्रेसचे अध्यक्ष, पाहा लिस्ट
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Congress President Election : गांधी घराण्याशिवाय हे ११ नेते होते कॉंग्रेसचे अध्यक्ष, पाहा लिस्ट

Congress President Election : गांधी घराण्याशिवाय हे ११ नेते होते कॉंग्रेसचे अध्यक्ष, पाहा लिस्ट

Congress President Election : गांधी घराण्याशिवाय हे ११ नेते होते कॉंग्रेसचे अध्यक्ष, पाहा लिस्ट

Published Sep 20, 2022 03:55 PM IST
  • twitter
  • twitter
Congress President Election 2022 : गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही. परंतु कॉंग्रेसनं ही निवडणूक घेण्याचं जाहीर केलं आहे. या निवडणुकीत शशी थरुर आणि अशोक गेहलोत यांच्या सामना होण्याची शक्यता आहे.
भोगराजू पट्टाभी सीतारामय्या हे स्वातंत्र्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. १९४८ ते १९४९ पर्यंत ते या पदावर राहिले.
twitterfacebook
share
(1 / 13)

भोगराजू पट्टाभी सीतारामय्या हे स्वातंत्र्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. १९४८ ते १९४९ पर्यंत ते या पदावर राहिले.

(Congress/ Twitter)
स्वातंत्र्यचळवळीतील महत्त्वाचे नेते पुरुषोत्तम दास टंडन हे १९४९ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते १९५१ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते.
twitterfacebook
share
(2 / 13)

स्वातंत्र्यचळवळीतील महत्त्वाचे नेते पुरुषोत्तम दास टंडन हे १९४९ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते १९५१ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते.

(Congress/ Twitter)
१९५५ मध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं यूएन ढेबर यांच्याकडे आली. ते १९५९ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. १९५२ साली भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यानंतर ढेबर यांनी खऱ्या अर्थानं कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेला आकार दिला.
twitterfacebook
share
(3 / 13)

१९५५ मध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं यूएन ढेबर यांच्याकडे आली. ते १९५९ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. १९५२ साली भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यानंतर ढेबर यांनी खऱ्या अर्थानं कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेला आकार दिला.

(Hindustan Coca-Cola Beverages/ Twitter)
त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी १९६० ते १९६३ या कालावधीत कॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद संभाळलं.
twitterfacebook
share
(4 / 13)

त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी १९६० ते १९६३ या कालावधीत कॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद संभाळलं.

(Vice President of India/ Twitter)
रेड्डी यांच्यानंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ के कामराज यांच्या गळ्यात पडली. कामराज हे १९६४ ते १९६७ या कालावधीत कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मतभेदांमुळं त्यांच्या अध्यक्षपदाची कारकिर्द चांगलीच गाजली होती.
twitterfacebook
share
(5 / 13)

रेड्डी यांच्यानंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ के कामराज यांच्या गळ्यात पडली. कामराज हे १९६४ ते १९६७ या कालावधीत कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मतभेदांमुळं त्यांच्या अध्यक्षपदाची कारकिर्द चांगलीच गाजली होती.

(Indian National Congress)
त्यानंतर एस. निजलिंगप्पा हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. ते १९६८ ते १९७० या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
twitterfacebook
share
(6 / 13)

त्यानंतर एस. निजलिंगप्पा हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. ते १९६८ ते १९७० या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

(indianhistorypics/ Twitter)
माजी उपपंतप्रधान जगजीवन राम हे देखील १९७० ते १९७१ या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
twitterfacebook
share
(7 / 13)

माजी उपपंतप्रधान जगजीवन राम हे देखील १९७० ते १९७१ या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

(Randeep Surjewala/ Twittter)
माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी १९७२ ते १९७४ या काळात काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूषवलं.
twitterfacebook
share
(8 / 13)

माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी १९७२ ते १९७४ या काळात काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूषवलं.

(Rajyavardhan Rathore/ Twitter)
त्यानंतर जेष्ठ नेते देवकांत बरुआ हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. १९७५ ते १९७७ असा त्यांचा कार्यकाळ होता. ‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इन इंडिया’ ही प्रसिद्ध घोषणा बरुआ यांनीच दिली होती. याशिवाय देशात लागलेल्या आणीबाणीच्या काळात ते कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिले होते.
twitterfacebook
share
(9 / 13)

त्यानंतर जेष्ठ नेते देवकांत बरुआ हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. १९७५ ते १९७७ असा त्यांचा कार्यकाळ होता. ‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इन इंडिया’ ही प्रसिद्ध घोषणा बरुआ यांनीच दिली होती. याशिवाय देशात लागलेल्या आणीबाणीच्या काळात ते कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिले होते.

( Nandan Pratim Sharma Bordoloi/ Twitter)
राजीव गांधी यांच्याकडून माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांनी कॉंग्रेस पक्षाची सूत्रं हातील घेतली. ते १९९२ ते १९९४ या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
twitterfacebook
share
(10 / 13)

राजीव गांधी यांच्याकडून माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांनी कॉंग्रेस पक्षाची सूत्रं हातील घेतली. ते १९९२ ते १९९४ या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

(@AgentSaffron/ Twitter)
सीताराम केसरी हे काँग्रेस पक्षाचे शेवटचे बिगरगांधी अध्यक्ष होते. त्यांनी १९९६ ते १९९८ पर्यंत कॉंग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं. त्यानंतर अद्याप बिगरगांधी घराण्याकडे कॉंग्रेसचं अध्यक्षपद गेलेलं नाही.
twitterfacebook
share
(11 / 13)

सीताराम केसरी हे काँग्रेस पक्षाचे शेवटचे बिगरगांधी अध्यक्ष होते. त्यांनी १९९६ ते १९९८ पर्यंत कॉंग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं. त्यानंतर अद्याप बिगरगांधी घराण्याकडे कॉंग्रेसचं अध्यक्षपद गेलेलं नाही.

(Wikipedia)
त्यानंतर आता अलीकडेच कॉंग्रेसनं अध्यक्षपदाची निवडणूक घेणार असल्याचं जाहीर केलंय. या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर हे आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं जर या दोन नेत्यांमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर कॉंग्रेसला तब्बल २४ वर्षांनंतर बिगरगांधी घराण्याचा अध्यक्ष मिळेल.
twitterfacebook
share
(12 / 13)

त्यानंतर आता अलीकडेच कॉंग्रेसनं अध्यक्षपदाची निवडणूक घेणार असल्याचं जाहीर केलंय. या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर हे आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं जर या दोन नेत्यांमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर कॉंग्रेसला तब्बल २४ वर्षांनंतर बिगरगांधी घराण्याचा अध्यक्ष मिळेल.

(Shashi Tharoor (Twitter))
सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यामुळं कॉंग्रेसवर गांधी घराण्याचंच वर्चस्व असल्याची टीका सातत्यानं विरोधी पक्षाकडून करण्यात येते. त्यामुळं आता २४ वर्षांनंतर बिगरगांधी अध्यक्ष निवडण्याची मोठी संधी पक्षासमोर असणार आहे.
twitterfacebook
share
(13 / 13)

सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या सर्वाधिक काळ अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यामुळं कॉंग्रेसवर गांधी घराण्याचंच वर्चस्व असल्याची टीका सातत्यानं विरोधी पक्षाकडून करण्यात येते. त्यामुळं आता २४ वर्षांनंतर बिगरगांधी अध्यक्ष निवडण्याची मोठी संधी पक्षासमोर असणार आहे.

(HT)
इतर गॅलरीज