(5 / 9)बेरिल चक्रीवादळामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ, त्यांचे कुटुंबीय, कोचिंग सपोर्ट स्टाफ, बीसीसीआयचे अधिकारी बार्बाडोसमध्ये अडकले होते. दोन दिवसांच्या शटडाऊननंतर विमानतळ कार्यान्वित होताच खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी बीसीसीआयला विशेष चार्टर्ड विमानाची व्यवस्था करावी लागली.