उन्हाळ्यात अनेकदा फळांचे रस रस्त्यावर विकले जाताना दिसतात. साहजिकच हे रस पिण्यास चांगले असतात. पण, रस्त्यावर विकले जाणारे हे रस प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच फळांच्या रसापेक्षा संपूर्ण फळे खाणे चांगले आहे. चला जाणून घेऊया का..
फायबरचा अभाव : तुम्ही दुकानातून ज्यूस विकत घेता, तेव्हा तो रस बनवण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. त्यामुळे हा रस तुमच्या आरोग्यासाठी चांगला असू शकत नाही. शिवाय, रस काढताना फळातील सर्व आवश्यक फायबर नष्ट होतात. त्यामुळे रस प्यायल्याने फळ खाल्ल्याचा फायदा शरीराला मिळत नाही.
रक्तातील साखर: फळांचा रस बनवताना सोडा आणि साखर वापरली जाते. हे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. फळांचा रस न पिता संपूर्ण फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
वजन वाढणे : फळांचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढतात. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. संपूर्ण फळे खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता नसते.
पोषक तत्वांची कमतरता: फळांमधील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स रस काढताना नष्ट होतात. फळांच्या पौष्टिकतेचा विचार केल्यास संपूर्ण फळ खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.