ताण तणाव ही अशी गोष्ट आहे जी आपण आयुष्यात टाळू शकत नाही, परंतु जेव्हा ताण वाढतो तेव्हा त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात. ताण वाढल्यानंतर कोर्टिसोल आणि एड्रेनालाईन सारखे आजार वाढू लागतात. चला पाहूया ताणाचे शरीरावर काय परिणाम होतात.
डोकेदुखी, त्वचेचे आजार, पाचक विकार किंवा हृदयरोग, रोगप्रतिकारक शक्तीचे नुकसान होणे हे सर्व आजार ताणावामुळे सुरु होतात. या सगळ्या आजारांचा शरीरावर परिणाम होतो.
ताणतणावाचा परिणाम सर्वप्रथम शरीराच्या पचनसंस्थेवर होतो. ओटीपोटात दुखणे, उलट्या, बेशुद्ध होणे, अपचन, पोटात जळजळ आणि छातीत जळजळ ही सर्व ताणाची लक्षणे आहेत.
तणावामुळे स्नायूंवर ताण पडतो. शरीराच्या विविध भागांमध्ये, विशेषत: मान, खांदे आणि पाठदुखी सुरु होते. सतत स्नायू घट्ट होण्यामुळे तीव्र वेदना समस्या उद्भवू शकतात.
तणावामुळे अनावश्यक ताण येतो आणि डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास सुरु होतो. आपल्या डोक्यातील आणि मानेतील स्नायू घट्ट होतात. यामुळे आपल्याला वेदना आणि अस्वस्थता येते. ही डोकेदुखी बर्याचदा तीव्र ताणामुळे होते
तणावामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाब वाढतो. तीव्र तणावामुळे तीव्र हृदयविकार होण्याची शक्यता असते. त्यामध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक चा समावेश आहे.
तीव्र ताण आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खराब करू शकतो. यामुळे तुम्हाला आजार आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे वारंवार आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच एखादी गोष्ट करण्याचा उत्साह देखील कमी होतो.
तणावामुळे तुमच्या वजनात फरक पडू शकतो. भूक कमी होते. यामुळे वजन वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. काही लोक तणावामुळे जास्त खातात. काही लोकांना अजिबात भूक लागत नाही. यामुळे त्यांच्या शरीरात बदल होतात.
स्त्रियांमध्ये, तणावामुळे मासिक पाळीत बदल होऊ शकतो, ज्यामुळे त्यांना अधिक वेदना जाणवतात आणि त्यांची कामेच्छा कमी होते.