Solar Eclipse 2022 : सूर्यग्रहण म्हटले की आपल्याकडे अनेक अंधश्रद्धा या पाळल्या जातात. ग्रहन काळात कुणी जेवत नाही. तर अनेक नागरिक हे बाहेर देखील पडत नाहीत. नागरिकांमध्ये असलेल्या या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वर्धा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 'ग्रहणात अन्न ग्रहण' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहण कसे पाहावे याची देखील माहिती देण्यात आली.
(1 / 5)
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज दिसले. खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने सूर्याचा काही भाग हा चंद्राच्या सावलीने झाकोळला गेला होता. भारतात सूर्यग्रहणाबद्दल अनेक गैरसमजुती आणि अंधश्रद्धा पाळल्या जातात. याच अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वर्ध्यात 'ग्रहणात अन्न ग्रहण' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
(2 / 5)
सूर्यग्रहणात अन्नाचे सेवन करणे हे टाळले जाते. या सोबत नागरिक घराबाहेर देखील पडत नाहीत. सूर्याची काळी सावली पडण्याच्या भीतीने नागरिक काही करत नाही. हे चुकीचे असून ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि या जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
(3 / 5)
वर्धा जिल्हा अंधश्रद्धा निर्मूल समितीचे अध्यक्ष पंकज वंजारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूर्यग्रहण पाहण्यासाठी आवश्यक असलेल्या चष्म्याची देखील सोय करण्यात आली होती. या चष्म्याच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांनी सूर्यग्रहण पाहिले.
(4 / 5)
खंडग्रास सूर्यग्राहणाचे टिपलेले आकर्षक छायाचित्र
(5 / 5)
सर्व जनतेने व निसर्ग प्रेमींनी कोणत्याही अंधश्रध्देला बळी न पडता, अश्या खगोलीय घटनेचे साक्षीदार व्हावे.मात्र सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी बघू नये असे आवाहन बहार नेचर फाउंडेशनचे सदस्य दर्शन दुधाने यांनी केले आहे.