आपण सहसा घरी तांदूळ धुण्यासाठी पाणी घेतो. पण तांदून धुवून झाल्यावर आपण हे पाणी फेकून देतो. तुम्हाला माहिती आहे का या पाण्याचे किती फायदे आहेत. तांदूळ धुतलेल्या पाण्यात अनेक खनिजे असतात. याव्यतिरिक्त, त्यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. जर तुम्हाला हे माहित असेल तर तुम्ही हे पाणी कधीही फेकणार नाही. चला जाणून घेऊया तांदळाच्या पाण्याचे फायदे..
ज्यांच्या चेहऱ्याची त्वचा अतिशय तेलकट आहे. त्यांच्यासाठी तांदळाचे पाणी हे खूप फायदेशीर आहे. हे पाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेला चमक येते आणि हलकी पांढरी होते.
(Pixabay)तांदूळ धुण्याच्या पाण्यात व्हिटॅमिन बी असतात. हे रोपांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी चांगले आहे. त्यात स्टार्च असतात. हे स्टार्च केवळ रोपांच्या वाढीसाठी उपयोगी नसतात तर जमिनीतील बुसशीच्या वाढीस मदत करतात.
हिवाळ्यात त्वचा लवकर कोरडी होते. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी ते तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. तसेच चेहऱ्यावर लालसरपणा आणण्यासाठी देखील मदत करतात.
(Freepik)