आमिर खानने बॉलिवूडला अनेक हिट आणि दिग्गज चित्रपट दिले आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेला 'गजनी' हाही असाच एक अविस्मरणीय चित्रपट आहे, जो आजही प्रेक्षकांना आवडतो. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये ३०० कोटींचा हिट क्लबही सुरू केला. आमिरच्या या सुपरहिट चित्रपटाची एक मनोरंजक गोष्ट म्हणजे तो या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हता. वास्तविक, चित्रपटाचे दिग्दर्शक मुरुगदास यांना सलमान खानला ‘गजनी’मध्ये मुख्य भूमिकेसाठी कास्ट करायचे होते. पण, हे पात्र आमिरच्या वाट्याला कसे आले, ही एक रंजक कहाणी आहे.
मुरुगदास यांचा चित्रपट 'गजनी' हा याच नावाच्या २००५ साली आलेल्या साऊथ चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शनही मुरुगदास यांनी केले होते. त्यांना त्याची हिंदी आवृत्तीही तयार करायची होती, म्हणून ते बॉलिवूडकडे वळले. या चित्रपटात सलमान खानने काम करावे, अशी मुरुगदास यांची इच्छा होती. पण, चित्रपटात खलनायकाची भूमिका करणाऱ्या प्रदीप रावत यांच्या सल्ल्याने त्यांचा विचार बदलला. चित्रपटासंदर्भात एका मुलाखतीदरम्यान, प्रदीप रावत यांनी स्वत: सांगितले होते की, मुरुगदास सलमान खानला कास्ट करण्यासाठी खूप उत्सुक होते.
अभिनेता म्हणाला, 'या ॲक्शन पॅक्ड कॅरेक्टरसाठी सलमान खानच सर्वोत्तम पर्याय असेल असा विश्वास होता. पण सलमान खानचा रागीट स्वभाव चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अडचणीचा ठरू शकतो असे मला वाटले.’ प्रदीप रावत म्हणतात, 'मुरुगदास याआधी हिंदी चित्रपट बनवण्याचा अनुभव नव्हता. मुरुगदास ना हिंदी बोलत होते ना त्यांना इंग्रजी येत होते. अशा परिस्थितीत जर सलमान खान चित्रपटाचा भाग बनेल, तर कम्युनिकेशन गॅपमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती होती.’
वास्तविक, प्रदीपने याआधी ‘सरफरोश’ या चित्रपटात काम केले होते आणि आमिरच्या शांत स्वभावामुळे संवादाची ही समस्या सुटू शकते, हे त्यांना माहीत होते.
प्रदीप रावत म्हणाले की, 'मी मुरुगदासला संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली आणि आमिर कसा व्यावसायिक अभिनेता आहे हे सांगितले. मी त्याला कधीही कोणावर रागावलेले किंवा वाईट वागताना पाहिले नाही. मात्र, आमिर खानला मनवायला सहा महिने लागले. त्यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट पाहिली आणि तो करण्यास होकार दिला.