राज्यात मॉन्सूनने प्रगती केली आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांनपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज आणि पुढील काही दिवस मुंबईत अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि उपनगरात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर, पुण्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. काल रात्री पासून ठाणे आणि पालघरमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. आणिबाणीच्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी आपत्ती निवारण दलाची पथके तैनात ठेवण्यात आली आहे.
आज सकाळपासून मुंबई शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तर, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात मौसमी वारे संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. तर पुढील पाच दिवस राज्याच्या अनेक भगत वीजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना पावसाला ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांनी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
(HT PHOTO)मुंबईत व उपनगरात शुक्रवारी देखील जोरदार पाऊस झाला. यानंतर आज शनिवारी देखील पुढील तीन ते चार तासात मुंबईत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोलीत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. तर नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
(Hindustan Times)मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. या पावसात खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
(HT_PRINT)विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोलीत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. तर नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
(HT PHOTO)