मुंबईत आज दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आज सकाळ पासून मुंबईत मोठ्या प्रमाणात ढग दाटले असून पावसाळा सुरुवात झाली आहे. पुढील काही तासांत मुंबई व उपनगर परिसरात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसामुळे वाढत्या उकड्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
(Shyamal Maitra)मुंबईत पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री मुंबई शहर व उपनगर परिसरात तुरळक ठिकाणी हल्या ते मध्यम स्वरूपच्या पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. या पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना या पाण्यातून वाट कडून जावे लागत असल्याने त्यांची गैरसोय झाली आहे.
(HT)मुंबईत काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आज सकाळी पासून देखील मुंबई शहर व उपनगर भगत संततधार पाऊस सुरू आहे.
(HT)हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
(HT)राज्यात या वर्षी मॉन्सूनने लवकर हजेरी लावली. मात्र, असे असले तरी काही कालावधीत हा पाऊस झाला. यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील पावसाचा जोर कमी झाला होता.
(Sai Saswat Mishra)पाऊस नसल्याने गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासह विदर्भात तापमान पुन्हा वाढले होते. त्यामुळे पाऊस कधी पडेल या प्रतीक्षेत राज्यातील नागरिक होते.
(AP)