Mahaparinirvan Din: पत्रकार आंबेडकर; लेखणीने केले अन्यायावर प्रहार, घडविली जनजागृती!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mahaparinirvan Din: पत्रकार आंबेडकर; लेखणीने केले अन्यायावर प्रहार, घडविली जनजागृती!

Mahaparinirvan Din: पत्रकार आंबेडकर; लेखणीने केले अन्यायावर प्रहार, घडविली जनजागृती!

Mahaparinirvan Din: पत्रकार आंबेडकर; लेखणीने केले अन्यायावर प्रहार, घडविली जनजागृती!

Dec 06, 2024 11:55 AM IST
  • twitter
  • twitter
Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विद्वान लेखक आणि पत्रकार म्हणूनही प्रसिद्ध होते. बाबासाहेबांनी पत्रकारितेला विशेष महत्त्व दिले. ज्या चळवळीकडे वर्तमानपत्र नाही ती चळवळ पंख कापलेल्या पक्षाप्रमाणे असते असे ते म्हणत असत. बाबासाहेबांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून चळवळीला बळ दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, दलित, शोषित, पीडितांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांच्यात जागृती घडवून आणण्यासाठी आणि विरोधक, तसेच सरकारला धारेवर धरण्यासाठी वृत्तपत्राचा मार्ग अवलंबला. त्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर आपली समर्थ लेखणी चालवत समाजात क्रांती घडवायला सुरू केले.
twitterfacebook
share
(1 / 5)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, दलित, शोषित, पीडितांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांच्यात जागृती घडवून आणण्यासाठी आणि विरोधक, तसेच सरकारला धारेवर धरण्यासाठी वृत्तपत्राचा मार्ग अवलंबला. त्यांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर आपली समर्थ लेखणी चालवत समाजात क्रांती घडवायला सुरू केले.
मूकनायक - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२० मध्ये ‘मूकनायक’ हे साप्ताहिक चालू केले होते. दलित आणि इतर उपेक्षित समुदयांना आवाज होणे हे त्याचे उद्दिष्ट होते. या वृत्तपत्राच्या शीर्शस्थानी संत तुकराम महाराज यांचा अभंग होता. या वृत्तपत्राचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर होते. तर दुसरे संपादक स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते.
twitterfacebook
share
(2 / 5)
मूकनायक - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२० मध्ये ‘मूकनायक’ हे साप्ताहिक चालू केले होते. दलित आणि इतर उपेक्षित समुदयांना आवाज होणे हे त्याचे उद्दिष्ट होते. या वृत्तपत्राच्या शीर्शस्थानी संत तुकराम महाराज यांचा अभंग होता. या वृत्तपत्राचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर होते. तर दुसरे संपादक स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते.
बहिष्कृत भारत – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२७ साली बहिष्कृत भारत सुरू केले. याच्या शीर्शस्थानी संत ज्ञानेश्वरांची ओवी होती. या पत्राचे संपादक स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. बहिष्कृत भारताच्या माध्यमातून त्यांनी आपली समतेची चळवळ अधिक गतीमान केली.
twitterfacebook
share
(3 / 5)
बहिष्कृत भारत – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२७ साली बहिष्कृत भारत सुरू केले. याच्या शीर्शस्थानी संत ज्ञानेश्वरांची ओवी होती. या पत्राचे संपादक स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. बहिष्कृत भारताच्या माध्यमातून त्यांनी आपली समतेची चळवळ अधिक गतीमान केली.
समता – बहिष्कृत भारत या पाक्षिकानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९२८ मध्ये “समता” साप्ताहिक सुरू केले. समता या साप्ताहिकाचा उद्देश समता आणि न्यायाच्या आदर्शांना चालना देणे हा होता. समता हे समता सैनिक दलाचे मुखपत्र होते. देवराम विष्णु नाईक हे 'समता'चे संपादक होते.
twitterfacebook
share
(4 / 5)
समता – बहिष्कृत भारत या पाक्षिकानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९२८ मध्ये “समता” साप्ताहिक सुरू केले. समता या साप्ताहिकाचा उद्देश समता आणि न्यायाच्या आदर्शांना चालना देणे हा होता. समता हे समता सैनिक दलाचे मुखपत्र होते. देवराम विष्णु नाईक हे 'समता'चे संपादक होते.
जनता- जनता हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर इ.स. १९३० रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. त्यानंतर गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे हे जनताचे संपादक झाले. जनता हे सुरुवातीला पाक्षिक होते. पुढे ३१ ऑक्टोबर १९३० रोजी ते साप्ताहिक झाले.
twitterfacebook
share
(5 / 5)
जनता- जनता हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर इ.स. १९३० रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. त्यानंतर गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे हे जनताचे संपादक झाले. जनता हे सुरुवातीला पाक्षिक होते. पुढे ३१ ऑक्टोबर १९३० रोजी ते साप्ताहिक झाले.
प्रबुद्ध भारत- अशोक विजयादशमी दिनी, १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यासोबतच ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ असे केले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’असे छापण्यात आले होते.  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले. ११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले. त्याचा १० मे २०१७ रोजी पहिला अंक प्रकाशित झाला. 
twitterfacebook
share
(6 / 5)
प्रबुद्ध भारत- अशोक विजयादशमी दिनी, १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यासोबतच ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ असे केले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’असे छापण्यात आले होते.  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले. ११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले. त्याचा १० मे २०१७ रोजी पहिला अंक प्रकाशित झाला. 
इतर गॅलरीज