Mahaparinirvan Din: बाबासाहेबांनी उभारल्या राष्ट्रव्यापी संस्था; गरीब, वंचितांसाठी झाला प्रगतीचा प्रशस्त मार्ग खुला!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mahaparinirvan Din: बाबासाहेबांनी उभारल्या राष्ट्रव्यापी संस्था; गरीब, वंचितांसाठी झाला प्रगतीचा प्रशस्त मार्ग खुला!

Mahaparinirvan Din: बाबासाहेबांनी उभारल्या राष्ट्रव्यापी संस्था; गरीब, वंचितांसाठी झाला प्रगतीचा प्रशस्त मार्ग खुला!

Mahaparinirvan Din: बाबासाहेबांनी उभारल्या राष्ट्रव्यापी संस्था; गरीब, वंचितांसाठी झाला प्रगतीचा प्रशस्त मार्ग खुला!

Dec 05, 2024 02:50 PM IST
  • twitter
  • twitter
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जग मानवी हक्कांसाठी लढणारा वंचितांचा कैवारी म्हणून ओळखतो. बाबासाहेबांनी देशातील अस्पृश्य समाजात स्वाभिमानाची ज्योत पेटवलीच, परंतु त्यांच्या सर्वागीण प्रगतीचा प्रशस्त मार्ग तयार केला. यांमध्ये त्यांनी उभारलेल्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचा समावेश आहे.
बहिष्कृत हितकारिणी सभा  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. वंचित, अन्याय अत्याताराने पीडित झालेल्या वर्गाच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने बाबासाहेबांनी ही संस्था सुरू केली. 
twitterfacebook
share
(1 / 6)
बहिष्कृत हितकारिणी सभा  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. वंचित, अन्याय अत्याताराने पीडित झालेल्या वर्गाच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने बाबासाहेबांनी ही संस्था सुरू केली. 
समता सैनिक दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ मार्च १९२७ साली अस्पृश्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी, त्याच बरोबर समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देत समाजात तो विचार रुजविण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली. आजही समता सैनिक दल कार्यरत आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)
समता सैनिक दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ मार्च १९२७ साली अस्पृश्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी, त्याच बरोबर समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देत समाजात तो विचार रुजविण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली. आजही समता सैनिक दल कार्यरत आहे.
स्वतंत्र मजूर पक्ष (द इंडिपेंडंट लेबर पार्टी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ साली दलितांच्या हक्कांसाठी, तसेच मजूर,  कामगार वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या पक्षाचे अध्यक्ष होते.
twitterfacebook
share
(3 / 6)
स्वतंत्र मजूर पक्ष (द इंडिपेंडंट लेबर पार्टी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ साली दलितांच्या हक्कांसाठी, तसेच मजूर,  कामगार वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या पक्षाचे अध्यक्ष होते.
अनुसूचित जाती फेडरेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ साली अनुसूचित जाती फेडरेशन (Scheduled Caste Federation)  या राजकीय पक्षाची स्थापना केली. अनुसूचित जातींच्या राजकीय हिताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता. याच पक्षाचे पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात रुपांतर झाले. बाबासाहेबांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. फाळणीनंतर या नावाची संस्था पाकिस्तानात देखील होती. १९४२ मध्ये ब्रिटिश कॅबिनेटमंत्री सर स्टेफोर्ट क्रिप्स् भारतात आले होते. त्यांच्यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच फेडरेशनच्या माध्यमातून अस्पृश्यांची राजकीय कैफियत मांडली. 
twitterfacebook
share
(4 / 6)
अनुसूचित जाती फेडरेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ साली अनुसूचित जाती फेडरेशन (Scheduled Caste Federation)  या राजकीय पक्षाची स्थापना केली. अनुसूचित जातींच्या राजकीय हिताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता. याच पक्षाचे पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात रुपांतर झाले. बाबासाहेबांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. फाळणीनंतर या नावाची संस्था पाकिस्तानात देखील होती. १९४२ मध्ये ब्रिटिश कॅबिनेटमंत्री सर स्टेफोर्ट क्रिप्स् भारतात आले होते. त्यांच्यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच फेडरेशनच्या माध्यमातून अस्पृश्यांची राजकीय कैफियत मांडली. 
द पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी द पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.  सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायांमध्ये शिक्षणाचा प्रसार आणि जागरूकता पसरवणे हे या संस्थचे उद्दीष्ट होते. या सोसायटीमार्फत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, मुंबई, मिलिंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, मुंबई, सिद्धार्थ विधी महाविद्यालय, मुंबई ही महाविद्यालये सुरू आहेत.  
twitterfacebook
share
(5 / 6)
द पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी द पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.  सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायांमध्ये शिक्षणाचा प्रसार आणि जागरूकता पसरवणे हे या संस्थचे उद्दीष्ट होते. या सोसायटीमार्फत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, मुंबई, मिलिंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, मुंबई, सिद्धार्थ विधी महाविद्यालय, मुंबई ही महाविद्यालये सुरू आहेत.  
भारतीय बौद्ध महासभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ मे १९५५ साली भारतीय बौद्ध महासभेची (The Buddhist Society of India) स्थापना केली. डॉ. आंबेडकरांनी सामाजिक आणि धार्मिक मुक्तीचे साधन म्हणून बौद्ध धर्माच्या शिकवणींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या आधारावर समाजाची रचना व्हावी, समाजात बुद्धिप्रामाण्यवाद रुजावा आणि सामाजिक, आर्थिक भेदभावाची दरी नष्ट व्हावी हे भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करण्यामागे बाबासाहेबांचा हेतू होता. 
twitterfacebook
share
(6 / 6)
भारतीय बौद्ध महासभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ मे १९५५ साली भारतीय बौद्ध महासभेची (The Buddhist Society of India) स्थापना केली. डॉ. आंबेडकरांनी सामाजिक आणि धार्मिक मुक्तीचे साधन म्हणून बौद्ध धर्माच्या शिकवणींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या आधारावर समाजाची रचना व्हावी, समाजात बुद्धिप्रामाण्यवाद रुजावा आणि सामाजिक, आर्थिक भेदभावाची दरी नष्ट व्हावी हे भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करण्यामागे बाबासाहेबांचा हेतू होता. 
इतर गॅलरीज