मौनी अमावस्येला संगमावर मोठी गर्दी होत असते व अनेकवेळा चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. महाकुंभमध्ये बुधवारी सकाळीही चेंगराचेंगरी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. या दुर्घटनेत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
(REUTERS)महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीच्या घटना नव्या नाहीत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा १९५४ मध्ये महाकुंभचे आयोजन केले होते. हा स्वतंत्र भारताचा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. मात्र ३ फेब्रुवारी १९५४ रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत जवळपास ८०० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. महाकुंभच्या इतिहासात ही सर्वात मोठी दुर्घटना होती.
(REUTERS)त्यानंतर १९८६ मध्ये हरिद्वार मध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. यात कमीत कमी २०० लोकांचा मृत्यू झाला होता. उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादुर सिंह देशातील अनेक मुख्यमंत्री व खासदारांना घेऊन संगमावर गेल्यानंतर ही घटना घडली होती. सामान्य लोकांना संगमावर जाण्यापासून प्रशासनाने रोखले होते. य़ामुळे गर्दी अनियंत्रित झाली व चेंगराचेंगरी झाली होती.
(REUTERS)नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे २००३ मध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात डझनभर लोक मृत्युमुखी पडले होते. लाखोंच्या संख्येने लोक गोदावरी किनारी स्नानासाठी गेल्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये शेकडो लोक गंभीररित्या जखमी झाले होते.
(PTI)प्रयागराज महाकुंभमध्ये २०१३ मध्येही चेंगराचेंगरी झाली होती. मात्र ही दुर्घटना गंगा किनारी झाली नव्हती तर अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर जाली होती. १० फेब्रुवारी २०१३ रोजी फुट ओव्हरब्रीज कोसळल्यामुळे हा अपघात झाला होता. यामुळे चेंगराचेंगरी झाली व ४२ लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर ४५ लोक जखमी झाले होते.
(PTI)आता २०२५ मध्येही अशीच घटना घडली आहे. सुरुळितपणे चाललेल्या कुंभमेळ्यात बुधवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली. य़ामध्ये काही जण मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर शेकडो जखमी झाले आहेत.
(REUTERS)