मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी ११६ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. मागील वेळेस कोणालाही बहुमत मिळवता आले नव्हते. यावेळी देखील काँग्रेस व भाजपमध्ये चुरशीची लढत झाली होती. (छायाचित्र - रॉयटर्स)
'जन की बात'च्या जनमत चाचणीनुसार, मध्य प्रदेशात भाजपला ११० ते १२३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला १०२ ते १२५ जागांवर संधी आहे. अन्य पक्ष आणि अपक्षांना ५ जागा मिळू शकतात. याचाच अर्थ मध्य प्रदेशात भाजपला जास्त संधी आहे. (फोटो सौजन्य पीटीआय)
न्यूज २४ टूडेच्या चाणक्य सर्वेक्षणानुसार, मध्य प्रदेशात पुन्हा भगवे वादळ घोंगावणार आहे. सत्ताधारी भाजप १५१ जागा जिंकू शकतो. काँग्रेसला केवळ ७८ जागांवर समाधान मानावं लागेल. इतरांना ५ जागा मिळतील. (फोटो - पीटीआय)