भारतात करवा चौथचा दिवस प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खास असतो. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात आणि नंतर चंद्र पाहून उपवास सोडतात. करवा चौथशी बॉलिवूडचाही विशेष संबंध आहे. या व्रताला चित्रपटांमध्ये खूप महत्त्व दाखवण्यात आले आहे.
पण तुम्हाला माहीत आहे का की, बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या हे व्रत पाळत नाहीत. होय, आज आम्ही तुम्हाला काही बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या करवा चौथचे व्रत पाळत नाहीत आणि त्यांच्या असे करण्यामागचे कारणही आपण जाणून घेणार आहोत.
या यादीत पहिले नाव आहे बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान. करीना कपूरने बॉलिवूड अभिनेत्री सैफ अली खानसोबत लग्न केले. ती आपल्या पतीसाठी हे व्रत करत नाही आणि तिला करवा चौथची संकल्पना समजत आणि पटत नसल्याचे ती म्हणते. करीना कपूर म्हणते की, पतीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी उपवास करण्याची गरज नाही.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या पतीसाठी करवा चौथ उपवास करत नाही. ती म्हणते की, तिला या दिवशी चांगले कपडे घालणे आणि मेंदी काढणे आणि खाणे पिणे आवडते. पण, सोनम हा उपवास का पाळत नाही, याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. परंतु, असे म्हटले जाते की, ती आरोग्याच्या समस्यांमुळे हा उपवास करत नाही.
जवळपास ८ वर्षे रिलेशनशिपनंतर दीपिका पदुकोणने रणवीर सिंहसोबत लग्न केले होते. दीपिका पदुकोण देखील करवा चौथचा उपवास ठेवत नाही आणि असे न करण्यामागचे कारण विचारले असता तिने सांगितले की, परस्पर प्रेम टिकवून ठेवण्यासाठी उपवास ठेवण्यापेक्षा एकमेकांना साथ देणे महत्त्वाचे आहे.
अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिचा देखील उपवास न ठेवण्यामागे असाच तर्क आहे. ट्विंकल खन्ना म्हणते की, एका व्यक्तीची उपासमार दुसऱ्याचे आयुष्य वाढवू शकत नाही. अभिनेत्री हा दिवस तिच्या पतीसोबत प्रेमाने घालवण्याचा प्रयत्न करते.