मात्र, चांगली गोष्ट म्हणजे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये भारतीय खेळाडूंचा वरचष्मा आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीच्या ५०० धावा पूर्ण- IPL २०२४ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा RCBचा फलंदाज विराट कोहलीने केल्या आहेत. त्याने आतापर्यंत १० सामने खेळून ५०० धावा केल्या आहेत. यावर्षी ५००चा आकडा गाठणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याच्या नावावर १ शतक आणि ४ अर्धशतके आहेत. तर ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ९ सामन्यात ४४७ धावा केल्या आहेत.
संजू सॅमसन आणि केएल राहुलही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शर्यतीत- जर आपण टॉप २ फलंदाजांनंतर पुढील यादीबद्दल बोललो, तर गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने १० सामने खेळून ४१८ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ९ सामन्यांत ३८५ धावा करून चौथ्या स्थानावर आहे आणि LSG कर्णधार केएल राहुल ९ सामन्यांत ३७८ धावा करून पाचव्या स्थानावर आहे. म्हणजेच टॉप ५ मध्ये भारतीय फलंदाजांची ताकद पाहायला मिळते.
सुनील नारायण सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू - सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये KKRचा सुनील नारायण टॉपवर आहे. आतापर्यंत ८ सामन्यात ३५७ धावा करण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याच्या नावावर १ शतक आणि २ अर्धशतके आहेत. एकूण यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे. अजून बरेच सामने बाकी असले आणि येत्या काही दिवसांत बरेच बदल होणार होऊ शकतात.
आयपीएल २०२४ ची पर्पल कॅप सध्या जसप्रीत बुमराहच्या डोक्यावर आहे. मुंबई इंडियन्सच्या स्टार वेगवान गोलंदाजाने ९ सामन्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत.