SL vs IND : पहिल्या वनडे मालिकेत कोच गौतम गंभीर फेल, भारताचा २७ वर्षांचा विजयरथ थांबला
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  SL vs IND : पहिल्या वनडे मालिकेत कोच गौतम गंभीर फेल, भारताचा २७ वर्षांचा विजयरथ थांबला

SL vs IND : पहिल्या वनडे मालिकेत कोच गौतम गंभीर फेल, भारताचा २७ वर्षांचा विजयरथ थांबला

SL vs IND : पहिल्या वनडे मालिकेत कोच गौतम गंभीर फेल, भारताचा २७ वर्षांचा विजयरथ थांबला

Updated Aug 07, 2024 09:37 PM IST
  • twitter
  • twitter
  • श्रीलंकेने २७ वर्षांनंतर मायदेशात भारताला द्विपक्षीय मालिकेत पराभूत केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत ०-२ असा पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण मालिकेत नवा प्रशिक्षक गौतम गंभीर डगआउटमध्ये असहाय दिसला.
मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने २४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यजमान संघाच्या फिरकीपटूंनी असा सापळा रचला की संपूर्ण भारतीय संघ २६.१ षटकांत १३८ धावांत गारद झाला आणि सामन्यासह मालिका गमावली.
twitterfacebook
share
(1 / 6)

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने २४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यजमान संघाच्या फिरकीपटूंनी असा सापळा रचला की संपूर्ण भारतीय संघ २६.१ षटकांत १३८ धावांत गारद झाला आणि सामन्यासह मालिका गमावली.

(PTI)
या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ३२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत भारताला शेवटची आणि तिसरी वनडे जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी होती, मात्र तसे होऊ शकले नाही. संघाचा ११० धावांनी पराभव झाला.
twitterfacebook
share
(2 / 6)

या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ३२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत भारताला शेवटची आणि तिसरी वनडे जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी होती, मात्र तसे होऊ शकले नाही. संघाचा ११० धावांनी पराभव झाला.

(AFP)
श्रीलंकेने २७ वर्षांनंतर घरच्या मैदानावर इतिहास रचला आहे. १९९७ नंतर प्रथमच त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात द्विपक्षीय वनडे मालिकेत पराभूत केले. यापूर्वी ऑगस्ट ११९७ मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यानंतर श्रीलंकेने वनडे मालिका ३-० ने जिंकली होती. एक सामना अनिर्णित राहिला.
twitterfacebook
share
(3 / 6)

श्रीलंकेने २७ वर्षांनंतर घरच्या मैदानावर इतिहास रचला आहे. १९९७ नंतर प्रथमच त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात द्विपक्षीय वनडे मालिकेत पराभूत केले. यापूर्वी ऑगस्ट ११९७ मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यानंतर श्रीलंकेने वनडे मालिका ३-० ने जिंकली होती. एक सामना अनिर्णित राहिला.

(AFP)
भारतीय संघाने आतापर्यंत श्रीलंकेच्या भूमीवर यजमानांविरुद्ध एकूण १० द्विपक्षीय वनडे मालिका (सध्याच्या मालिकेसह) खेळल्या आहेत. यापैकी भारतीय संघाने ५ तर श्रीलंकेने ३ मालिका जिंकल्या आहेत. २ मालिका अनिर्णित राहिल्या.
twitterfacebook
share
(4 / 6)

भारतीय संघाने आतापर्यंत श्रीलंकेच्या भूमीवर यजमानांविरुद्ध एकूण १० द्विपक्षीय वनडे मालिका (सध्याच्या मालिकेसह) खेळल्या आहेत. यापैकी भारतीय संघाने ५ तर श्रीलंकेने ३ मालिका जिंकल्या आहेत. २ मालिका अनिर्णित राहिल्या.

(AP)
प्रशिक्षक म्हणून गंभीरची पहिलीच एकदिवसीय मालिका - मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच एकदिवसीय मालिका होती आणि त्यात तो अपयशी ठरला. संपूर्ण मालिकेत तो असहाय दिसत होता. भारतीय संघ फिरकीपटूंसमोर कोलमडत असल्याचे दिसून येत होते, परंतु संघाची ही कमकुवतता दूर करण्यात गंभीर अपयशी ठरला.
twitterfacebook
share
(5 / 6)

प्रशिक्षक म्हणून गंभीरची पहिलीच एकदिवसीय मालिका - मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच एकदिवसीय मालिका होती आणि त्यात तो अपयशी ठरला. संपूर्ण मालिकेत तो असहाय दिसत होता. भारतीय संघ फिरकीपटूंसमोर कोलमडत असल्याचे दिसून येत होते, परंतु संघाची ही कमकुवतता दूर करण्यात गंभीर अपयशी ठरला.

(AFP)
 कोहलीची कामगिरीही अत्यंत खराब - स्टार फलंदाज विराट कोहलीला आतापर्यंत दोन सामन्यांत केवळ ५८ धावा करता आल्या आहेत. त्याने सहज विकेट गमावली आहे जी संघासाठी चिंतेची बाब आहे. गेल्या सामन्यात कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र २० धावा केल्यानंतर तो अपयशी ठरला. अशाप्रकारे त्याला या मालिकेत केवळ ५८ धावा करता आल्या.
twitterfacebook
share
(6 / 6)

 कोहलीची कामगिरीही अत्यंत खराब - स्टार फलंदाज विराट कोहलीला आतापर्यंत दोन सामन्यांत केवळ ५८ धावा करता आल्या आहेत. त्याने सहज विकेट गमावली आहे जी संघासाठी चिंतेची बाब आहे. गेल्या सामन्यात कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र २० धावा केल्यानंतर तो अपयशी ठरला. अशाप्रकारे त्याला या मालिकेत केवळ ५८ धावा करता आल्या.

(PTI)
इतर गॅलरीज