मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Weather Updates : उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना दिलासा कधी?, पाहा मुंबईतील हवामान अंदाज

Mumbai Weather Updates : उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना दिलासा कधी?, पाहा मुंबईतील हवामान अंदाज

Sep 20, 2023 03:26 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Mumbai Weather Updates : हवामानात सतत होत असलेल्या बदलामुळं मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Maharashtra Rain Update : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राजधानी मुंबईच्या तापमानात मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. चटका वाढल्याने मुंबईकरांना उकाड्याने हैराण केलं आहे.

(1 / 5)

Maharashtra Rain Update : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राजधानी मुंबईच्या तापमानात मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. चटका वाढल्याने मुंबईकरांना उकाड्याने हैराण केलं आहे.(Sai Saswat Mishra)

Mumbai Rain and Weather Update : परंतु आता हवामान खात्याने मुंबईकरांना सुखावणारा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांच्या भागात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.

(2 / 5)

Mumbai Rain and Weather Update : परंतु आता हवामान खात्याने मुंबईकरांना सुखावणारा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांच्या भागात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.(AP)

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत रिमझिम पावसाची शक्यता आहे. त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(3 / 5)

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवसांत रिमझिम पावसाची शक्यता आहे. त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.(PTI)

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता याच महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

(4 / 5)

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता याच महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.(AP)

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली आहे. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची अद्यापही प्रतिक्षाच आहे.

(5 / 5)

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली आहे. मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची अद्यापही प्रतिक्षाच आहे.(PTI)

WhatsApp channel

इतर गॅलरीज