मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Rain Updates : पावसाळा संपत आला तरीही मुंबई कोरडीच; हवामान खात्याचा अंदाज काय?

Mumbai Rain Updates : पावसाळा संपत आला तरीही मुंबई कोरडीच; हवामान खात्याचा अंदाज काय?

Sep 16, 2023 09:22 AM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

IMD predictions on Mumbai weather : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Rain Updates : पावसाळ्याचा अखेरचा महिना सुरू असताना मुंबईत मात्र पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. शहरातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे.

(1 / 6)

Mumbai Rain Updates : पावसाळ्याचा अखेरचा महिना सुरू असताना मुंबईत मात्र पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. शहरातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे.(PTI)

Mumbai Rain update : पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह ठाण्यात ढगाळ वातावरण राहणार असून या दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

(2 / 6)

Mumbai Rain update : पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह ठाण्यात ढगाळ वातावरण राहणार असून या दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Rain Updates : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मुंबईत वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला होता. परंतु सप्टेंबर सुरू होताच पावसाने दडी मारली आहे.

(3 / 6)

Maharashtra Rain Updates : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मुंबईत वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला होता. परंतु सप्टेंबर सुरू होताच पावसाने दडी मारली आहे.(HT)

Maharashtra Rain Update Today : मध्य भारतातील राज्यांमध्ये मान्सूनचे वारे वाहत आहे. या हवामान बदलाचा महाराष्ट्र तसेच मुंबईवरही परिणाम होणार आहे.

(4 / 6)

Maharashtra Rain Update Today : मध्य भारतातील राज्यांमध्ये मान्सूनचे वारे वाहत आहे. या हवामान बदलाचा महाराष्ट्र तसेच मुंबईवरही परिणाम होणार आहे.(Yatish Lavania)

कोकण, ठाणे, पालघर, नवी मुंबई या ठिकाणी देखील येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं आता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

(5 / 6)

कोकण, ठाणे, पालघर, नवी मुंबई या ठिकाणी देखील येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं आता उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. (AP)

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाळा संपणार आहे. यावर्षी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

(6 / 6)

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाळा संपणार आहे. यावर्षी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.(PTI)

WhatsApp channel

इतर गॅलरीज