ICC Cricket World Cup 2023 : यंदाच्या आयसीसी विश्वचषकाची दिमाखात सुरुवात होत आहे. दोन्ही गटातील टीममध्ये सराव सामन्यांना सुरुवात झालेली आहे.
(Pitamber Newar)बांगलादेश-श्रीलंका आणि भारत-इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळं रद्द झाला आहे. त्यामुळं आता आगामी विश्वचषकातील सामन्यांवरही पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे.
(PTI)विश्वचषकातील काही सामने पावसामुळं रद्द झाल्यास त्याचा स्पर्धेवर परिणाम होणार आहे. अशावेळी आयसीसीसीकडून काय निर्णय घेतला जाईल?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
(PTI)ऑक्टोबर महिना सुरू झालेला असला तरी देशातील अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं आगामी विश्वचषकातील सामन्यांत पावसाचा अडथळा आल्यास डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर सामन्यांच्या विजयाचं गणित ठरणार आहे.
(AP)साखळी सामन्यांसाठी आयसीसीच्या नियमात राखीव दिवसाचा नियम नाहीय. उपांत्य किंवा अंतिम फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवसाची सोय देण्यात येते. त्यामुळं उपांत्य आणि अंतिम फेरी वगळल्यास अन्य सामने पावसामुळं थेट रद्द होतील.
(AP)रद्द झालेल्या सामन्यातील संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात येणार आहे. साखळी सामने हे दिवस-रात्र पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळं याचा संघांना फायदा होण्याची शक्यता आहे.
(AP)