निरोगी राहण्यासाठी तुम्ही हंगामी फळे खाऊ शकता. पावसाळ्यात कोणती फळे खाता येतात त्याची यादी पाहूया.
लिची: पावसाळ्यात आपण लिची फळ खावे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे आपल्या शरीरातील उर्जा क्षमता आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. हे आपल्या शरीराला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स देखील प्रदान करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
नाशपती: पावसाळ्यात अनेक इन्फेक्शनशी लढण्यासाठी आपल्याला भरपूर व्हिटॅमिन्सची गरज असते. नाशपतीमध्ये सर्व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. या ऋतूत आर्द्रता जास्त असल्याने लवकर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात हे फळ खावे.
पपई: पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे उत्तम आहे. याशिवाय यामध्ये असलेले फायबर अनेक आजारांशी लढते.
चेरी: चेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे संसर्ग रोखतात. यामुळे मनाला शांती मिळते.
ब्लू बेरी: यात कॅलरी कमी असतात. हे लोह, फोलेट, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यासारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. पावसाळ्यात किरकोळ आजारांशी लढण्याची क्षमता या फळात आहे.
डाळिंब: डाळिंब हे पावसाळ्यात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे फळ आहे. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. डाळिंबाच्या दाण्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात.