मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. ११ ते १२ जुलै रोजी सकाळपर्यंत कुलाबा येथे ८६ मिमी तर सांताक्रूझ येथे ११५ मिमी पावसाची नोंद झाली. चेंबुर येथील पोस्टल कॉलनीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून यातून मार्ग काढतांना दुचाकी चालक पादचारी यांची तारांबळ उडाली होती.
(Satish Bate/Hindustan Times)भारतीय हवामान खात्याने मुंबईला शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, तसेच उपनगरात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
(Satish Bate/Hindustan Times)मुंबईसह शहरासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये १५ जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे.
(Satish Bate/Hindustan Times)आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उपनगरीय रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि तीन तासात १७० मिमी पावसाची नोंद झाली होती.
(PTI)शहरात पाणी साचल्याने बसमार्गही वळविण्यात आले आहेत. शहराची लाईफलाईन असलेल्या सार्वजनिक उपनगरीय गाड्यांनाही विलंब होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
(Satish Bate/Hindustan Times)