हिवाळ्याचे आगमन म्हणजे विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे बाजारात येण्याची वेळ. हिवाळ्यात बाजारात येणाऱ्या सर्व फळांचे पोषणमूल्यही चांगले असते. या सीझनमध्ये भरपूर फळे खाल्ली जातात. मात्र, दिवसाच्या कोणत्या प्रहरी फळे खावीत, हे तुम्हाला माहीत आहे का?
रात्री फळे का खाऊ नयेत? : अनेकांना दिवसभर फळे खायला वेळ मिळत नाही. म्हणून असे लोक रात्री फळे खातात. मात्र, सूर्यास्तानंतर शरीरातील पचनक्रिया कमी होते, असे तज्ज्ञ ल्यूक कौटिन्हो यांचे म्हणणे आहे. दरम्यान, फळे हे प्रकारचे कार्ब आहेत, तसेच, ती उर्जेचा खूप जलद स्त्रोत आहे आणि त्यात शुगर स्पाइक्सची क्षमता आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर फळे खाणे फायदेशीर ठरत नाही. यामुळे पचनाचे विकार होऊ शकतात. त्याचा परिणाम रात्रीच्या झोपेवर होऊ शकतो. तसेच रात्री फळे खाल्ल्याने अॅसिडिटी, अपचन होण्याची शक्यता असते, असेही म्हटले जाते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा तुम्ही फळे खाता तेव्हा फळं खाण्यात आणि जेवण्यात किती काळ अंतर आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हे अंतर किमान ३० मिनिटांचे असावे. असेही म्हटले जाते की, फळे खाल्ल्यानंतर झोपू नये.
असे म्हटले जाते की फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळची असते. मात्र, उठल्यानंतर सफरचंद किंवा पेरू चावणे योग्य ठरणार नाही. तोंड धुवून फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी फळे खाल्ल्यास त्यातील एंझाइम्स आणि व्हिटॅमिन्स व्यवस्थित काम करतात, असं म्हटलं जातं.
फळे खाण्याची योग्य वेळ : अनेकांना ब्रेकफास्टनंतर आणि दुपारच्या जेवणापूर्वी काहीतरी खायचे असते. फळे खाण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले जाते. नाश्ता केल्यानंतर पोट भरले असेल, तर ते अन्न फळे सहज पचवू शकते.
व्यायाम केल्यास जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खावे लागतात, असे म्हटले जाते. आणि बऱ्याच वेळा जिमच्या आधी किंवा नंतर काहीही जड खाण्यास मनाई केली जाते. अशावेळी तुम्ही फळे खाऊ शकता, पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे करू नका.
‘या’ वेळी फळे अजिबात खाऊ नयेत? मुख्य जेवणासोबत फळे खाल्ल्याने पचनक्रियेवर ताण पडतो. म्हणूनच, मुख्य जेवण खाण्याच्या एक तास आधी किंवा नंतर फळे खाण्याकहा सल्ला दिल जातो. फळे चहा-कॉफीसोबत खाऊ नयेत. ही सवय वाईट तर आहेच, शिवाय विषबाधाही होऊ शकते. असं म्हटलं जातं की, रात्री झोपण्यापूर्वी फळं खाणं योग्य नाही.