पाणी पिण्याच्या चुकांची काही उदाहरणे येथे आहेत. पाणी पिताना या चुका टाळल्या पाहिजेत. या चुकांची पुनरावृत्ती करू नका. पाणी पिताना काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या.
निरोगी राहण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. जिवंत राहण्यासाठी इतर पोषक घटकांप्रमाणेच पाण्याचे नियमित सेवन केले पाहिजे. रोज किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे, असे अनेकांचे म्हणणे आहे. म्हणजे कमी-अधिक ३-४ लिटर पाणी प्यावे. आपल्याला पुरेसे पाणी पिण्याची गरज तर असतेच, पण पाणी पिताना आपण सर्व जण काही सामान्य चुका करतो, ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यांचीही काळजी घेतली पाहिजे.
वॉटर रिटेंशन: आपल्यापैकी अनेक जण ही चूक करतात. असे म्हटले जाते की, वृद्ध व्यक्तींनी बसून पाणी प्यावे. कारण उभे राहून पाणी प्यायल्याने मज्जातंतूंवर ताण येऊ शकतो, द्रव संतुलन बिघडू शकते आणि अपचन होऊ शकते. उभं राहून पाणी न पिण्याचा सल्ला आयुर्वेदात देखील दिला आहे. आयुर्वेदानुसार जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा ते ओटीपोटात जाते आणि तुम्हाला पोषक द्रव्ये पुरवू शकत नाही.
खूप फास्ट पाणी पिणे: काही वेळा आपण घाईत किंवा खूप तहानलेले असताना खूप लवकर पाणी पितो. हे मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या खाली जमा होते. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. पचनक्रिया चांगली होण्यासाठी हळूहळू पाणी प्या.
गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे: पाणी पिणे महत्वाचे असल्याने बरेच लोक जास्त पाणी पितात. पण जास्त पाणी प्यायल्याने फायदा होत नाही. जास्त पाणी पिणे देखील हानिकारक ठरू शकते. यामुळे मेंदूला सूज येऊ शकते.
जेवणापूर्वी पाणी पिणे: बऱ्याचदा वेट लॉस डाएटमध्ये जेवणापूर्वी पाणी पिण्याची शिफारस केली जाते, जेणेकरून आपण कमी कॅलरी वापरू. पण ती योग्य गोष्ट नाही. आपले पोट ५० टक्के अन्न, २५ टक्के पाणी आणि २५ टक्के रिकामे असावे, असे पोषणतज्ज्ञ सांगतात. यामुळे पचनक्रिया सुलभ होते. जेवणापूर्वी पाणी पिणे आपल्याला पोषक द्रव्यांपासून वंचित ठेवू शकते आणि पचन प्रक्रियेत व्यत्यय आणू शकते. यामुळे मळमळ आणि बद्धकोष्ठता देखील उद्भवू शकते.