मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  GT vs MI Qualifier 2 : खराब सुरुवात करूनही मुंबईने प्लेऑफमध्ये एन्ट्री कशी मिळवली? 'ही' आहेत ३ मोठी कारणं

GT vs MI Qualifier 2 : खराब सुरुवात करूनही मुंबईने प्लेऑफमध्ये एन्ट्री कशी मिळवली? 'ही' आहेत ३ मोठी कारणं

26 May 2023, 15:57 IST Rohit Bibhishan Jetnavare
26 May 2023, 15:57 IST

IPL 2023 GT vs MI: आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. पण संघाने चमकदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर एलिमिनेटरमध्ये लखनौला हरवून मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-२ मध्ये एन्ट्री केली. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये हा संघ गुजरात टायटन्सला भिडेल.

या मोसमात मुंबईचा प्रवास सोपा नव्हता. यंदाच्या मोसमात मुंबईच्या कामगिरीत चढ-उतार होत असले तरी आता योग्य वेळी त्यांचा संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे.

(1 / 7)

या मोसमात मुंबईचा प्रवास सोपा नव्हता. यंदाच्या मोसमात मुंबईच्या कामगिरीत चढ-उतार होत असले तरी आता योग्य वेळी त्यांचा संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे.(all photos - iplt20.com)

IPL 2023 मध्ये पहिल्या दोन सामन्यात मुंबईला वाईट पराभवाला सामोरे जावे लागले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जकडून त्यांचा पराभव झाला होता. मात्र यानंतर मुंबईने पुनरागमन करत सलग ३  सामने जिंकले. पण त्यानंतर मुंबईला पुन्हा दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने यंदा त्यांना दोनदा पराभूत केले.

(2 / 7)

IPL 2023 मध्ये पहिल्या दोन सामन्यात मुंबईला वाईट पराभवाला सामोरे जावे लागले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जकडून त्यांचा पराभव झाला होता. मात्र यानंतर मुंबईने पुनरागमन करत सलग ३  सामने जिंकले. पण त्यानंतर मुंबईला पुन्हा दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने यंदा त्यांना दोनदा पराभूत केले.

मुंबईने आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले, परंतु काही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले. हेच खेळाडू मुंबईचे बलस्थान ठरले. त्यांच्या फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही आपली ताकद दाखवून दिली.

(3 / 7)

मुंबईने आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले, परंतु काही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले. हेच खेळाडू मुंबईचे बलस्थान ठरले. त्यांच्या फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही आपली ताकद दाखवून दिली.

मुंबईने प्लेऑफ गाठण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे संघाची एकूण कामगिरी. मुंबईने १४ पैकी ८ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होते. यानंतर मुंबईने एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला.

(4 / 7)

मुंबईने प्लेऑफ गाठण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे संघाची एकूण कामगिरी. मुंबईने १४ पैकी ८ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होते. यानंतर मुंबईने एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला.

एलिमिनेटरमध्ये मुंबईच्या विजयामागे आकाश मढवालची महत्त्वाची भूमिका होती. त्याने ५ विकेट घेत लखनौचे कंबरडे मोडले. क्वालिफायर-२ पर्यंतच्या प्रवासात फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

(5 / 7)

एलिमिनेटरमध्ये मुंबईच्या विजयामागे आकाश मढवालची महत्त्वाची भूमिका होती. त्याने ५ विकेट घेत लखनौचे कंबरडे मोडले. क्वालिफायर-२ पर्यंतच्या प्रवासात फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सूर्यकुमार यादवने संघाकडून १५ सामने खेळत ५४४ धावा केल्या. त्याने एक शतक आणि ४ अर्धशतके झळकावली. कॅमेरून ग्रीन संघासाठी गेम चेंजर ठरला. त्याने १५ सामन्यात ४२२ धावा केल्या. मात्र या सर्व धावा त्याने कठीण परिस्थित केल्या.

(6 / 7)

सूर्यकुमार यादवने संघाकडून १५ सामने खेळत ५४४ धावा केल्या. त्याने एक शतक आणि ४ अर्धशतके झळकावली. कॅमेरून ग्रीन संघासाठी गेम चेंजर ठरला. त्याने १५ सामन्यात ४२२ धावा केल्या. मात्र या सर्व धावा त्याने कठीण परिस्थित केल्या.

मुंबई इंडियन्सने क्वालिफायर गाठण्याची सर्वात मोठी तीन कारणे- १) फलंदाजांची मजबूत कामगिरी, २) गोलंदाजांची अचूक गोलंदाजी, ३) कर्णधार रोहित शर्माची निर्णयक्षमता.

(7 / 7)

मुंबई इंडियन्सने क्वालिफायर गाठण्याची सर्वात मोठी तीन कारणे- १) फलंदाजांची मजबूत कामगिरी, २) गोलंदाजांची अचूक गोलंदाजी, ३) कर्णधार रोहित शर्माची निर्णयक्षमता.

इतर गॅलरीज