डिजिटल फसवणूक रोखण्याच्या उद्देशाने सरकारने आतापर्यंत सायबर गुन्हे किंवा आर्थिक फसवणुकीत आढळलेले ७० लाख मोबाइल क्रमांक निलंबित केले आहेत, अशी माहिती त्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी दिली.
बँकांना यासंदर्भात प्रणाली आणि प्रक्रिया मजबूत करण्यास सांगितले आहे. अशा आणखी बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील बैठक जानेवारीत होणार आहे, असेही जोशीने म्हटले आहे.
डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्मद्वारे रेकॉर्ड केलेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये आणि आर्थिक फसवणुकीत आढळून आलेले ७० लाख मोबाइल कनेक्शन रद्द करण्यात आले आहेत. सुमारे ९०० कोटी रुपये फसवणूकीपासून वाचले आहेत, ज्यामुळे ३.५ लाख पीडितांना फायदा झाला आहे, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.