तुळशीच्या झाडाला आरोग्यासाठी वरदान मानले जात असल्याने हिंदू धर्मात तिची पूजा केली जाते. तुळशीच्या रोपाला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर आयुर्वेदिक महत्त्वही आहे. तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. तुळशीच्या पानांच्या आरोग्यासाठी होणारे फायदे बहुतेक लोकांना माहित असतात. पण तुम्हाला माहित आहे का, तुळशीच्या पानांप्रमाणेच याच्या बिया सुद्धा आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.
पचन सुधारू शकतेः तुळशीच्या बिया हे सब्जा, फालूदा बिया आणि तुकमढी बिया अशा अनेक नावांनी ओळखल्या जातात. तुळशीच्या बियांमध्ये फायबर, आवश्यक फॅटी अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स, लोह आणि मॅग्नेशियम सारखे घटक आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे देतात. यामुळे व्यक्तीची पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते, वजन कमी होते, खोकला आणि सर्दीचा त्रास दूर होतो.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीरः वजन कमी करण्यासाठी तुळशीच्या बियांचे नियमित सेवन फायदेशीर ठरते. हा उपाय करण्यासाठी तुळशीच्या बिया पाण्यात उकळून घ्यावेत. त्यानंतर हे पाणी गाळून गरम गरम प्यावे. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे. या पाण्यात मुबलक प्रमाणात फायबर असते, जे चयापचय वाढवून चरबी जाळण्यास मदत करते. याशिवाय अल्फा लिनोलेनिक अॅसिड आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड तुळस बियांमध्ये आढळणारे हे दोन गुणधर्म चरबी जाळण्यास मदत करतात.
मजबूत प्रतिकारशक्तीः तुळशीच्या बिया कमकुवत प्रतिकारशक्ती बळकट करून व्यक्तीला लवकर आजारी पडण्यापासून वाचवते. या बियांमध्ये असलेले असंख्य अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळण्यास देखील मदत करतात. इतकंच नाही तर या बियांमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून सर्दी-खोकल्यापासून आराम देतात.
बद्धकोष्ठताः तुळशीच्या बिया बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करण्यास देखील मदत करतात. जर तुम्ही बऱ्याच काळापासून बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर तुळशीचे दाणे पाण्यात भिजवून दररोज सकाळी प्या. या पेयाची चव वाढविण्यासाठी तुम्ही यात एक चमचा मध देखील घालू शकता. रोज हे पेय प्यायल्यास शरीरातील फायबरची कमतरता दूर होईल, आतड्यांसंबंधी हालचाली सोप्या होतील आणि बद्धकोष्ठता दूर होईल.
सर्दीपासून आरामः सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्याचे काम बिया करतात. या बियातील अँटीबायोटिक आणि अँटीवायरल गुणधर्म बदलत्या हवामानामुळे होणारी सर्दी, फ्लू, खोकला आणि कफ कमी करण्याचे काम करतात. हा उपाय करण्यासाठी तुळशीच्या बियांची कॉफी बनवून दिवसातून दोनदा प्या. हवं तर यात गूळ आणि लिंबू घालू शकता.