बॉलिवूडमध्ये तुम्ही अनेक रोमँटिक चित्रपट बनत असल्याचे पाहिले असेल, परंतु असे काही चित्रपट देखील बनले आहेत ज्यामध्ये प्रेमात केलेला विश्वासघातही दाखवण्यात आला आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा चित्रपटांबद्दल सांगतो ज्यात प्रेमात धोका मिळाला आहे.
(instagram)कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या ‘पती-पत्नी और वो’ या चित्रपटातही विवाहबाह्य कथा आहे. एक मध्यमवर्गीय माणूस जो सुरुवातीला आपले वैवाहिक जीवन एन्जॉय करतो, पण नंतर हळूहळू कंटाळू लागतो आणि दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो. मात्र, हा प्रकार त्याच्या प्रेमीकाला आणि पत्नीला समजल्यावर दोघेही त्याला धडा शिकवण्यासाठी एकत्र आले..
(instagram)२०१६ साली प्रदर्शित झालेला रुस्तम हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अक्षयने एका नेव्ही अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो. पण नंतर एक दिवस घरी आल्यानंतर त्याला कळते की त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे समजल्यानंतर तो समोरच्या व्यक्तीचा खून करतो, पण यादरम्यान आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर येतात ज्यात देशभक्तीचा अँगलही समोर येतो.
(instagram)कभी अलविदा ना कहना या चित्रपटात शाहरुख खान, प्रिती झिंटा, राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात माया (राणी मुखर्जी) आणि देव (शाहरुख खान) आपापल्या लग्नाला कंटाळले असतात. दरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ येतात. दोघांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु होते. चित्रपटातील शाहरुख आणि राणीची केमिस्ट्री आवडली असली तरी फसवणुकीच्या या कथेवर काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते.
(instagram)