तुम्ही दुकानात गेल्यावर तेथे ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीवर बेस्ट बिफोर लेबलची माहिती दिली जाते. याचा अर्थ तुम्ही खरेदी केलेली वस्तू किती काळ वापरू शकता. परंतु, हे आवश्यक नाही की, प्रत्येक वस्तू विशिष्ट तारखेपर्यंत आणि महिन्यापर्यंतच वापरता येईल. कारण स्वयंपाकघरातील अनेक घटक आहेत जे महिने किंवा वर्षे टिकू शकतात आणि वापरल्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. यामध्ये धान्य, मीठ आणि तांदूळ अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे ज्या स्वयंपाकघरात दीर्घकाळ ठेवता येतात.
(freepik)कोरोना लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत, जेव्हा बाहेरची दुकाने बंद होती तेव्हा या गोष्टींचे महत्त्व लक्षणीय वाढले. सेल्फ क्वारंटाइनच्या काळात या गोष्टी उपयोगी ठरल्या. उदाहरणार्थ, काही खाद्यपदार्थ जसे की मध आणि साखर योग्यरित्या साठवल्यास सुरक्षित आणि आयुष्यासाठी चांगले राहते. पण, येथे आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या त्या ६ गोष्टींबद्दल माहिती देत आहोत ज्या एक्सपायरी डेटच्या पुढे आहेत आणि कधीही वापरल्या जाऊ शकतात.
मध कालांतराने रवाळ बनू शकतो परंतु तो शिळा होत नाही किंवा बाद होत नाही. जर तुमचा मध बराच काळ साठवून ठेवल्याने रवाळ बनत असेल, तर तुमचे सीलबंद कंटेनर 5-10 मिनिटे कोमट पाण्याखाली सरकवा. यामुळे ते पुन्हा मऊ होईल आणि सामान्य स्वरूपात दिसू लागेल. शिवाय त्याची चवही नेहमीप्रमाणे गोड असेल. पण मध शुद्ध असावा आणि भेसळ नसावा.
साखर हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात सामान्य घटकांपैकी एक आहे. जो मीठाप्रमाणे जवळजवळ दररोज वापरला जातो. साखर योग्य भांड्यात ठेवावी आणि साखर घेण्यासाठी ओल्या चमच्याचा वापर न करण्याची खात्री करा. साखरेला आर्द्रतेपासून दूर ठेवल्यास ती वर्षानुवर्षे सहज टिकते. दीर्घकाळ साठवल्यास ते घट्ट होऊ शकते, परंतु त्याच्या गोडपणात फरक नाही पडणार. पांढरी आणि तपकिरी साखर दोन्ही हवाबंद डब्यात साठवून ठेवावी. ते नेहमी ओलावा आणि उष्णतेपासून दूर ठेवले पाहिजे.
भात, डाळ आणि विविध भाज्या तयार करण्यासाठी दररोज मीठ वापरले जाते. हे मुख्यतः आपल्या जेवणात चव वाढवणारे घटक आहे. खरं तर, मीठ इतर पदार्थ साठवण्यासाठी देखील वापरले जाते, कारण ते नैसर्गिक संरक्षक म्हणून देखील कार्य करते.मधाप्रमाणे मीठ देखील बॅक्टेरियाचे निर्जलीकरण करते आणि जर आपण ते योग्यरित्या साठवले तर ते वर्षानुवर्षे वापरले जाऊ शकते. परंतु, जर मीठ मजबूत किंवा आयोडीनयुक्त असेल तर ते नेहमीच्या जुन्या मिठाच्या तुलनेत कालांतराने खराब होऊ शकते.
कॉर्नस्टार्चचा वापर मुख्यतः ग्रेव्ही, सॉस आणि सूप घट्ट करण्यासाठी केला जातो. ते बऱ्याच काळासाठी देखील साठवले जाऊ शकते. परंतु आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की ते कोणत्याही प्रकारच्या ओलाव्याच्या संर्पकात येऊ नये. तुम्ही कॉर्नस्टार्च एअर टाईट जारमध्ये ठेवू शकता आणि ते काही वर्षे चांगले राहील.
तांदूळ फक्त डाळींसोबतच नाही तर भाजी, खीर आणि पुलावमध्येही वापरला जातो. तांदूळ नेहमी हवाबंद डब्यात ठेवावा. तुम्ही एका मोठ्या डब्यात चांगला तांदूळ ठेवू शकता आणि दैनंदिन वापरासाठी छोटा डबाही वेगळा ठेवू शकता. असे केल्याने, मोठ्या डब्यात ठेवलेला तांदूळ ओलाव्याच्या संपर्कात येण्यापासून संरक्षित केला जाईल. कारण पांढरा तांदूळ ओलाव्यामुळेच खराब होऊ शकतो.