आजारी पडलेले भगवान जगन्नाथ आणि त्यांचे भाऊबहीण उद्या आजारातून पूर्णपणे बरे होऊन भक्तांना दर्शन देणार आहेत. जगन्नाथ पुरीची रथयात्रा उद्या म्हणजेच २० जून २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. या रथयात्रेतल्या रथाचं बांधकाम काही महिने आधी सुरू होतं आणि या रथाची लाकडं कापायला सोन्याची कुऱ्हाड वापरली जाते. पाहूया भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेची काही खास वैशिष्ट्य
(फोटो सौजन्य पीटीआय)
रथ बनवण्याचे नियम : भगवान जगन्नाथाचा रथ बनवण्यासाठी तब्बल दोन महिने लागतात. यासाठी काही ठराविक कारागीर तिथे राहातात. त्यांना संपूर्ण दोन महिने काही नियमांचं पालन करावं लागतं. रथ तयार करण्यासाठी, पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाकडाची निवड. रथासाठी खिळे किंवा खोदलेल्या लाकडाचा वापर केला जात नाही. रथाचे लाकूड सरळ आणि शुद्ध असावं लागतं.
या रथाचं सारथ्यं करणाऱ्या सारथ्य़ांना एकावेळचं जेवण बंधनकारक आहे. त्यांना या काळात पौष्टीक अन्न खावं लागतं. या काळात त्यांना मासाहार करता येत नाही. कारागिरांनाही सात्विक अन्न अर्थात शाकाहार बंधनकारक असतो. त्यांना ब्रम्हचर्याचंही पालन करावं लागतं. कारागिराच्या कुटूंबातील सुतक किंवा पाताक यांसारखी कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्या कारागिराला रथ बनवण्याच्या कामातून माघार घ्यावी लागते.
सोन्याच्या कुऱ्हाडीने रथाचे लाकूड कापले : जगन्नाथ रथयात्रेसाठी रथ बनवण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुरू होते. रथ बनवण्यासाठी जंगलातून लाकूड आणले जाते, त्यासाठी मंदिर समितीचे लोक वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देतात आणि त्यानंतर मंदिराचे पुजारी जंगलात जाऊन लाकूड बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झाडांची पूजा करतात. पूजेनंतर ती झाडे सोन्याच्या कुऱ्हाडीने तोडली जातात. या कुऱ्हाडीला सर्वप्रथम भगवान जगन्नाथाच्या मूर्तीला स्पर्श केला जातो.
(Getty)