झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे झारखंडमध्ये भाजप सत्तेबाहेर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. निवडणूक निकालात स्पष्ट बहुमत पाहून जेएमएमचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या जनतेचे आभार मानले आहे. झारखंडमध्ये आजपासून एक नवा अध्याय सुरु होणार असल्याचे सांगितले.
Hemant Soren, Jharkhand Mukti Morcha (JMM) in Ranchi: Today a new chapter will begin for this state. I want to assure everyone that their hopes will not be broken irrespective of their caste, creed, religion and profession. #JharkhandElectionResults pic.twitter.com/vIONxhl98K
— ANI (@ANI) December 23, 2019
झारखंड निकालानंतर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया
हेमंत सोरेन यांनी पत्रकार परिषद घेत असे सांगितले की, 'झारखंडच्या जवळपास ४० दिवसांच्या निवडणूक प्रवासाचा आज शेवटचा दिवस आहे. आज संपूर्ण राज्यात मतमोजणी सुरू आहेत. निकाल देखील स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आलेल्या मोजणीनुसार झारखंडच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा मी आदर करतो. सर्व मतादारांचे मी आभार व्यक्त करतो, असे त्यांनी सांगितले आहे.
Jharkhand Mukti Morcha's (JMM) Hemant Soren in Ranchi: I want to thank Lalu ji, Sonia ji, Rahul ji and Priyanka ji & all Congress leaders for all the support & for believing in me. #JharkhandAssemblyPolls pic.twitter.com/oMW8wp6xsY
— ANI (@ANI) December 23, 2019
'झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला'
पुढे त्यांनी असे सांगितले की, 'आजचा दिवस झारखंडच्या जनतेसाठी उत्साहाचा दिवस आहे. मात्र माझ्यासाठी राज्य आणि राज्यातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करू शकेल असा संकल्प करण्याचा दिवस आहे. लालू प्रसाद यादव, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे देखील त्यांनी सांगितले.