वर्धा येथील प्रचार सभेत केलेल्या भाषणात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून निवडणूक आयोगाने मोदींना क्लिनचीट दिली आहे. केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निर्णयावरून ‘कॉंग्रेस नेत्यांनी अल्पसंख्याकबहुल भागात आश्रय घेतला आहे, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथे १ एप्रिल रोजीच्या प्रचारसभेत केले होते.
यासंदर्भात कॉंग्रेसने ५ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या आणखी चार तक्रारी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या. वर्धा येथील प्रचार सभेतील भाषणात मोदींनी आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाने त्यांना क्लिनचीट दिली.
Election Commission: In matter related to a complaint concerning alleged violation of Model Code of Conduct in a speech by PM Narendra Modi in Wardha, Maharashtra on 01.04.2019, Commission is of the considered view that in this matter no such violation has been noticed. pic.twitter.com/oCNjMkpWSO
— ANI (@ANI) April 30, 2019
मोदी आणि शाह हे निवडणूक प्रचारामध्ये भारतीय लष्कराचा वापर करत आहेत, अशी तक्रार काँग्रेसने केली होती. याप्रकरणी स्पष्टिकरण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निवडणूक आयोगाला दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निवडणूक आयोगाला आपले म्हणणे मांडण्यासाठी २ मेपर्यंतची मुदत दिली आहे.