सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात काँग्रेस पक्षाकडून सोमवारी दुपारी नवी दिल्लीत राजघाटावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या दोन्हींविरोधात काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली असून, अधिकाधिक नागरिकांनी राजघाटावर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केले आहे.
नुसत्या आडनावाने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची टीका
राजघाटावर सोमवारी दुपारी तीन वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात होईल. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार आहे. काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी राज्यघटनेतील काही तरतुदींचे वाचनही करण्यात येणार आहे. अधिकाधिक लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी स्वतः राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून सोमवारी सकाळी आवाहन केले.
Dear Students & Youth of 🇮🇳,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 23, 2019
It’s not good enough just to feel 🇮🇳. At times like these it’s critical to show that you’re 🇮🇳 & won’t allow 🇮🇳 to be destroyed by hatred.
Join me today at 3 PM at Raj Ghat, to protest against the hate & violence unleashed on India by Modi-Shah.
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण केवळ भारतीय आहोत म्हणून चालणार नाही. अशा कठीण प्रसंगी तुम्ही भारतीय आहात हे दाखवून दिले पाहिजे आणि समाजात कोणालाही फूट पाडू दिली नाही पाहिजे. समाजात द्वेष पसरविणाऱ्यांविरोधात होणाऱ्या आंदोलनात माझ्यासोबत सहभागी व्हा.
Jharkhand: १९ वर्षांच्या इतिहासात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही
प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
ये देश एक साझा रिश्ता है, साझा ख़्वाब है। इस मिट्टी को हमने मेहनतों के रंग से सींचा है। संविधान हमारी शक्ति है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 23, 2019
देश को फूट डालो और राज करो की राजनीति से बचाना है। आइए आज दोपहर 3 बजे से बापू की समाधि राजघाट पर मेरे साथ संविधान पाठ का हिस्सा बनिए।