केरळमधील वायनाड जिल्ह्यात झालेल्या भुस्खलनामुळे मोठी जिवीतहानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमधील मेपाड्डी, मुंडक्कल आणि चूरलमाला परिसरामधील अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा मंगळवारी सायंकाळी १२३ वर पोहोचला.
भूस्खलनामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, झाडे उन्मळून पडली आहेत आणि भाग पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वायनाडमधील बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी आणि पुढील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
संबंधित बातम्या