टीएमसीचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांनी दावा केला की, भाजपचे दोन खासदार २१ जुलै रोजी टीएमसीमध्ये सामील होत आहेत. त्यांनी म्हटले की, भाजपचे दोन खासदार २१ जुलै रोजी आयोजित शहीद दिवस समारंभात तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बनर्जी आणि राष्ट्रीय महासचिव अभिषेक बनर्जी याबाबत अंतिम निर्णय घेतील.
घोष यांनीम्हटले की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बंगालमधून भाजपचे १२ खासदार निवडून आलेआहेत. त्यापैकी २ खासदार आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही खासदारांनी आमच्याशी संपर्क साधून तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. २१ जुलै रोजी होणाऱ्या शहीद दिवस कार्यक्रमात ते तृणमूलमध्ये प्रवेश करू शकतात. या खासदारांची ओळख सध्या उघड करता येणार नाही. एवढेच नाही तर, हे खासदार नुकतेच निवडून आले आहेत. यामुळे पक्षांतरविरोधी कायद्याच्या कक्षेत येऊ नये, म्हणून तृणमूल नेतृत्वाने त्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिला असल्याचेही घोष यांनीम्हटले.
यासंदर्भात बोलताना भाजपच्या बंगाल युनिटचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री सुकांता माजुमदार म्हणाले, कुणाल घोष अनेकदा अशी विधाने करतात ज्यांना गांभीर्याने घेतले जाऊ नये. ते प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची विधानं करत असतात. २१ जुलैपर्यंत थांबले पाहिजे. आम्ही याआधीही घोष यांच्यासारख्या नेत्यांचे असले दावे पाहिले आहेत. ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी असले दावे करत असतात. भाजपने म्हटले की, टीएमसीकडून असले दावे होत असतात. लोकांनी हे गांभीर्याने घेऊ नये.
खोटी ओळख व प्रमाणपत्रं दाखवून आयएएसची परीक्षा देणाऱ्या व प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होताच गैरवर्तन करणाऱ्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) मोठा दणका दिला आहे. यूपीएससीनं तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून नागरी सेवा परीक्षा -२०२२ मधील तिची उमेदवारी रद्द का करू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भविष्यात तिला पुन्हा परीक्षा देण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या