Assam accident : ट्रकची बसला धडक! भीषण अपघात १२ प्रवासी ठार; अनेक जण जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Assam accident : ट्रकची बसला धडक! भीषण अपघात १२ प्रवासी ठार; अनेक जण जखमी

Assam accident : ट्रकची बसला धडक! भीषण अपघात १२ प्रवासी ठार; अनेक जण जखमी

Published Jan 03, 2024 08:57 AM IST

Assam Golaghat accident : आसाम येथे भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसला ट्रकने धडक दिली असून या अपघातात १२ प्रवासी ठार झाले आहेत. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे.

Assam accident
Assam accident

truck hits bus in assam 12 passengers killed : आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात तब्बल ४५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकने समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात पाच महिला आणि एका अल्पवयीन मुलासह १२ जण ठार झाले आहे, ही घटना राष्ट्रीय महामार्ग ३७ वर डेरगाव येथे आज पहाटे ५ वाजता घडली.

Pune PMC : पुणेकरांनो सावधान! आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास भरावा लागणार दंड; पालिकेचा निर्णय

मिळालेल्या महितीनुसार आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात सुमारे ४५ जणांनी भरलेली बस गोलाघाटहून तिनसुकियाच्या दिशेने जात होती. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकने या बसला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भयंकर होता की, यात ट्रक आणि बसच्या दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. तर बस मधील १२ प्रवाशांचा देखील मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी तातडीने जखमींना डेरगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले. गंभीर जखमींना जोरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जेएमसीएच) भरती करण्यात आले आहे.

Shirdi News : मोठी बातमी! काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर जीवघेणा हल्ला, रॉडने केली बेदम मारहाण

गोलाघाटचे उपायुक्त पी. उदय प्रवीण म्हणाले, "राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूने रस्त्याची दुरुस्ती सुरू होती आणि त्यामुळे दोन्ही दिशांची वाहने दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने जात होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ट्रक सुसाट वेगाने येत होता. बसमधील बहुतांश प्रवासी भारलुखुवा गावातील होते. ते तीनसुकिया येथील तिलिंगा मंदिरात जात होते. तेथून ते बोगीबील येथे पिकनिकला जात होते. यावेळी हा अपघात झाला.

गोलाघाटचे पोलिस अधीक्षक राजेन सिंह म्हणाले, आम्ही बस आणि ट्रकमधून १० मृतदेह बाहेर काढले आहेत. जेएमसीएचमध्ये दाखल झालेल्या २७ जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला. बेदरकारपणे आणि बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे आपघतास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर