Rahul Gandhi : राहुल गांधींचे वायनाडच्या जनतेसाठी भावनिक पत्र; म्हणाले, 'जेव्हा मला अत्याचाराला सामोरं जावं लागलं...'
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : राहुल गांधींचे वायनाडच्या जनतेसाठी भावनिक पत्र; म्हणाले, 'जेव्हा मला अत्याचाराला सामोरं जावं लागलं...'

Rahul Gandhi : राहुल गांधींचे वायनाडच्या जनतेसाठी भावनिक पत्र; म्हणाले, 'जेव्हा मला अत्याचाराला सामोरं जावं लागलं...'

Jun 23, 2024 11:37 PM IST

Rahul Gandhi : राहुल गांधी रायबरेलीची जागा ठेवतील, तर त्यांची बहीण प्रियांका गांधी वायनाडची पोटनिवडणूक लढवतील, अशी घोषणा काँग्रेसने १७ जून रोजी केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेला भावनिक पत्र लिहिले आहे.

राहुल गांधीचे वायनाडच्या जनतेसाठी भावनिक पत्र
राहुल गांधीचे वायनाडच्या जनतेसाठी भावनिक पत्र (ANI)

लोकसभेत दोन ठिकाणाहून निवडून आलेल्या राहूल गांधी यांनी गांधी कुटूंबीयाचा पारंपरिक मतदारसंघ रायबरेली कायम ठेवत दुसरा मतदारसंघ वायनाडचे प्रतिनिधीत्व सोडले आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधील जनतेला भावनिक पत्र लिहिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मला दररोज अत्याचाराला सामोरे जावे लागले, तेव्हा वायनाडच्या  लोकांच्या बिनशर्त प्रेमाने  माझे रक्षण केले.

राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, "मी तुमच्यासाठी अनोळखी होतो आणि तरीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलास. तुम्ही मला अपार प्रेमाने आणि आपुलकीने मिठी मारलीत. तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा दिला हे महत्त्वाचे नाही, तुम्ही कोणत्या समाजाचे आहात, कोणत्या धर्मावर विश्वास ठेवता किंवा कोणती भाषा बोलता हे महत्त्वाचे नाही, असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

"जेव्हा मला दिवसेंदिवस अत्याचाराला सामोरे जावे लागले, तेव्हा तुमच्या बिनशर्त प्रेमाने माझे रक्षण केले. तुम्ही माझा आश्रय होतात, माझं घर आणि माझं कुटुंब होतात. तुम्ही माझ्यावर संशय घेतला असं मला क्षणभरही वाटलं नाही.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघांत लाखोच्या मताधिक्यांनी विजय मिळवला. नियमानुसार ४ जून रोजी निकाल लागल्यानंतर १४ दिवसांच्या आत त्यांना एक जागा सोडावी लागत होती.

राहुल गांधी रायबरेलीची जागा ठेवतील, तर त्यांची बहीण प्रियांका गांधी वायनाडची पोटनिवडणूक लढवतील, अशी घोषणा काँग्रेसने १७ जून रोजी केली होती. त्यांचा हा पहिलाच निवडणूक दौरा असणार आहे.

संसदेत वायनाडच्या जनतेचा आवाज बनणे ही माझ्यासाठी खरोखरच आनंदाची आणि सन्मानाची बाब असल्याचे राहुल यांनी रविवारी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

"मला आठवते, तुम्ही मला दिलेली असंख्य फुले आणि मिठी. प्रत्येकाला अशा अस्सल प्रेमाने आणि कोमलतेने दिले आहे. ज्या शौर्याने, सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने तरुण मुली हजारो लोकांसमोर माझ्या भाषणांचे भाषांतर करत असत, ते मी कसे विसरू शकतो.

आपली बहीण प्रियांका वायनाडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने राहुल गांधी यांनी सांगितले. संधी मिळाल्यास त्या खासदार म्हणून उत्तम काम करतील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

रायबरेलीच्या लोकांमध्ये माझे एक प्रेमळ कुटुंब आहे आणि एक नाते आहे जे मी मनापासून जपतो. तुम्हाला आणि रायबरेलीच्या जनतेला माझी वचनबद्धता आहे की आम्ही देशात पसरवल्या जाणाऱ्या द्वेष आणि हिंसाचाराशी लढू आणि पराभूत करू.

तुम्ही माझ्यासाठी जे केलं त्याबद्दल तुमचे आभार कसे मानावेत हे मला कळत नाही. जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही मला जे प्रेम आणि संरक्षण दिले त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात आणि मी तुमच्या प्रत्येकासाठी सदैव सोबत राहीन, असे ते म्हणाले.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर