Operation Sindoor: भारत-पाकमध्ये तनाव; जम्मू, अमृतसरसह देशातील १८ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; २०० उड्डाणे रद्द
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Operation Sindoor: भारत-पाकमध्ये तनाव; जम्मू, अमृतसरसह देशातील १८ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; २०० उड्डाणे रद्द

Operation Sindoor: भारत-पाकमध्ये तनाव; जम्मू, अमृतसरसह देशातील १८ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; २०० उड्डाणे रद्द

Published May 07, 2025 05:14 PM IST

Indian Airspace Alert : ऑपरेशन सिंदुरनंतरभारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १० मे पर्यंत देशातील १८विमानतळ बंद राहतील. त्यात जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भूज, श्रीनगर, लेह आणि जामनगर एअरपोर्टचा समावेश आहे.

देशातील १८ विमानतळे १० मे पर्यंत बंद
देशातील १८ विमानतळे १० मे पर्यंत बंद (Representational image/AP)

Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे देशभरातील विमान सेवेवर परिणाम झाला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर उत्तर आणि पश्चिम भारतातील किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

या विमानतळांमध्ये श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, सिमला, धर्मशाला आणि जामनगर या विमानतळांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या इंडिगो एअरलाइन्सने जवळपास १६० उड्डाणे रद्द केली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथून येणारी सर्व उड्डाणे १० मे रोजी पहाटे ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

बुधवारी २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आणि १८ विमानतळांचे कामकाज तात्पुरते बंद करण्यात आल्याने उत्तर आणि पश्चिम भारतातील हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.

भारतीय सैन्याने आज पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर'चा भाग म्हणून हा हवाई हल्ला करण्यात आला.

श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, सिमला, धर्मशाला आणि जामनगर सह प्रमुख विमानतळे बंद करण्यात आली आहेत. एअरलाइन्सने प्रवाशांना वन टाइम रिशेड्यूलिंग चार्ज माफ करण्याचा किंवा पूर्ण परतावा मिळवण्याचा पर्याय दिला आहे.

विमान कंपन्यांनी उड्डाणे केली रद्द -

इंडिगोने एकूण १६५ उड्डाणे रद्द केल्याने सर्वाधिक फटका बसला आहे. एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, हवाई हद्दीवरील निर्बंधांबाबत सरकारच्या अधिसूचनेमुळे इंडिगोच्या विविध विमानतळांवरून १६५ हून अधिक उड्डाणे... १० मे २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार ०५.२९ वाजेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत.

एअर इंडियाने जम्मू, श्रीनगर, लेह आणि अमृतसरसह अनेक शहरांमधील सेवा बंद केली आहे. एअर इंडियाने म्हटले आहे की, "एअर इंडियाखालील स्थानकांवर ये-जा करते... ही विमानतळे बंद करण्याबाबत हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या अधिसूचनेनंतर १० मे रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५.२९ वाजेपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत.

इंडिगो आणि एअर इंडिया या दोन्ही कंपन्या प्रभावित प्रवाशांना रिशेड्यूलिंग चार्जेस किंवा पूर्ण परताव्यावर सूट देत आहेत.

एअर इंडिया एक्सप्रेसने 'एक्स'वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही अमृतसर, ग्वाल्हेर, जम्मू, श्रीनगर आणि हिंडन येथून १० मे २०२५ रोजी सकाळी ०५.३० वाजेपर्यंत आमच्या उड्डाणांसाठी पूर्ण परतावा किंवा विनामूल्य रिशेड्यूलिंग ऑफर करत आहोत.

धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती स्पाइसजेटने सोशल मीडियावर दिली आहे. प्रस्थान, आगमन आणि परिणामी उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो, असेही कंपनीने म्हटले आहे.

अकासा एअर आणि प्रादेशिक विमान सेवा स्टार एअर यांनीही अनेक ठिकाणी, विशेषत: उत्तरेतील आपली सेवा रद्द केली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसने अनेक उड्डाणे रद्द केल्याची घोषणा करताना म्हटले आहे की, "आमच्या नेटवर्कवरील अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे... दुपारपर्यंत."

दिल्ली विमानतळावरील ३५ उड्डाणे रद्द -

देशातील सर्वात व्यस्त असलेल्या दिल्ली विमानतळावर मध्यरात्रीपासून किमान ३५ उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये २३ देशांतर्गत प्रस्थान, आठ आगमन आणि चार आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे.

अमेरिकन एअरलाइन्स आणि कतार एअरवेजसह परदेशी विमान कंपन्यांनीही काही उड्डाणे स्थगित केली आहेत. पाकिस्तानी हवाई हद्द बंद केल्यामुळे कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारे उड्डाण तात्पुरते थांबवले आहे.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (डायल) या परिणामाची कबुली देताना म्हटले आहे की, बदलत्या हवाई हद्दीमुळे दिल्ली विमानतळावरील काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे.

डझनभर आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग बदलले -

रॉयटर्सला मिळालेल्या फ्लाइट ट्रॅकिंग छायाचित्रांवरून असे दिसून आले आहे की भारतावरील वायव्य आकाश आणि पाकिस्तानची संपूर्ण हवाई हद्द व्यावसायिक विमानांनी जवळजवळ रिकामी आहे आणि केवळ काही उड्डाणे अद्याप दिसत आहेत.

सीमेपलीकडील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्यासाठी २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

ग्लोबल फ्लाइट ट्रॅकिंग सर्व्हिस फ्लाइटरडार २४ नुसार, बुधवारी सकाळपर्यंत विमान कंपन्यांनी पाकिस्तानातून येणारी किंवा तिथून जाणारी ५२ उड्डाणे रद्द केली आहेत.

खबरदारी चा उपाय म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानवरील मार्ग बंद केले आहेत. डच विमान कंपनी केएलएमच्या प्रवक्त्याने पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तानवरून उड्डाण करणार नसल्याची पुष्टी केली. सिंगापूर एअरलाइन्सनेही ६ मे पासून पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर बंद केला आहे.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर