ओमानला नकोय भारतातील कोंबड्यांची अंडी; तब्बल १५ कोटी रुपयांची अंडी गोदामात पडून…
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ओमानला नकोय भारतातील कोंबड्यांची अंडी; तब्बल १५ कोटी रुपयांची अंडी गोदामात पडून…

ओमानला नकोय भारतातील कोंबड्यांची अंडी; तब्बल १५ कोटी रुपयांची अंडी गोदामात पडून…

Dec 18, 2024 04:27 PM IST

Oman stops eggs import form Namakkal: रशिया-युक्रेन युद्धानंतर आखाती देशांतून तामिळनाडू येथील नमक्कल येथील अंड्यांना मोठी मागणी होती. दुबई आणि ओमान प्रामुख्याने ही अंडी आयात करत होते. मात्र, त्यांनी ही आयात थांबवल्याने तामिळनाडू येथील उद्योग अडचणीत आला आहे.

ओमानने थांबली अंड्याची आयात! तामिळनाडूचा पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका
ओमानने थांबली अंड्याची आयात! तामिळनाडूचा पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

Oman stops eggs import form Namakkal: ओमानने भारतातून अंडी आयात करण्याचे थांबवले आहे. या घटनेमुळे तामिळनाडू येथील नमक्कलमधील पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे. येथील टेबल अंडी चांगल्या दर्जासाठी जगप्रसिद्ध आहेत. मात्र, ओमानने अंड्यांसाठी नवीन आयात परवाने देणे थांबवल्याने येथील व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

द्रमुकचे खासदार केआरएन राजेशकुमार यांनी मंगळवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. भारतातून अंड्यांची आयात पुन्हा सुरू करण्यासाठी ओमान आणि कतारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली. राजेशकुमार म्हणाले, "मी भारतातील ओमान आणि कतारच्या राजदूतांसोबत पोल्ट्री उत्पादक आणि अंडी निर्यातदारांसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी भेट देण्याची विनंती केली आहे.

नमक्कल येथील अंडी निर्यातदार आणि पशुधन आणि कृषी-शेतकरी व्यापार महासंघ (LIFT) चे सरचिटणीस पी.व्ही. सेंथिल म्हणाले की, या निर्बंधांमुळे सध्या किमान १५ कोटी रुपयांच्या भारतीय अंड्यांची मोठी खेप अडकून पडली आहे. अनेक कंटेनर हे ओमानच्या सोहर बंदरावर असून ते उतरवण्यात आलेली नाहीत. यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

नमक्कलच्या निर्यातदारांच्या मते, ओमान आणि कतार या दोन प्रमुख आयातदार देशांमुळे भारतातील अंडी निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे  तमिळनाडूतील व्यवसायात अडचणीत सापडला आहे.

ओमानने भारतीय टेबल अंड्यांसाठी आयात परवाने देणे बंद केल्यापासून नमक्कल अंडी निर्यातदारांना जूनपासून आर्थिक फटका बसला आहे. कॉन्सुलर स्तरावर अनेक बैठकांनंतर, ओमानने सप्टेंबरमध्ये आयात पुन्हा सुरू केली होती. मात्र, काही मर्यादित उत्पादकांना आयातीच्या परवानग्या देण्यात आल्या. मात्र, मंगळवारी ओमानने पुन्हा भारतीय अंड्यांसाठी नवीन आयात परवाने देणे बंद करण्याचा निर्णय घेतला.

नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी (NECC) कडील माहितीनुसार या वर्षाच्या सुरूवातीस, ओमान, कतार, दुबई, अबू धाबी, मस्कत, मालदीव आणि श्रीलंका यासह विविध देशांमध्ये ११४ दशलक्ष अंडी निर्यात करण्यात आली होती, त्यापैकी ५० टक्के अंडी ही ओमानमध्ये निर्यात करण्यात आली होती. मात्र, जून मध्ये या आकडेवारीत घट होऊन तो केवळ २.६ कोटींवर आला.

नमक्कलच्या अंड्यांना मागणी का?

नमक्कल अंडी भारतात खूप प्रसिद्ध आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे या अंड्यांची निर्यात वाढली. रशिया-युक्रेन युद्धानंतर आखाती देश तुर्कियेकडून अंड्यांची आयात करत होते. मात्र, ही अंडी त्यांना महागात मिळत होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंड्यांची वाढती मागणी पाहता तुर्कीने अंड्यांचे दर झपाट्याने वाढवले. अशा परिस्थितीत नमक्कलच्या अंडी उत्पादकांना मोठी संधी मिळाली. कारण येथील अंडी तुर्कीच्या तुलनेत स्वस्त आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दुबई, कतार आणि ओमानसारखे देश नमक्कल अंडी आयात करत होते. मात्र, हे परवाने आता थांबवण्यात आल्याने येथील व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर