Mohan Bhagwat On pahalgam attack : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा केवळ कोणत्याही संप्रदाय किंवा धर्माच्या नावावर नसून धर्म आणि अधर्म यांच्यात आहे. धर्माच्या आधारे लोकांची हत्या करणारे धर्मांध असून असे वर्तन हे राक्षसी प्रवृत्तीचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले. दहशतवादाविरोधात कारवाई करण्यावर भर देताना संघप्रमुख म्हणाले, 'आमच्यात ताकद असेल तर ती दाखवावी लागेल.
ही लढाई संप्रदाय किंवा धर्मयांच्यात नाही. त्याचा आधार धर्म आणि संप्रदाय नक्कीच आहे, पण प्रत्यक्षात तो धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे. ते पुढे म्हणाले की, "भारतीय सैनिक किंवा नागरिकांनी धर्माच्या आधारावर कधीही कोणाची हत्या केली नाही. हिंदू कधीही धर्माच्या आधारावर मारत नाहीत. धर्मामुळे लोकांची हत्या करणारे धर्मांध असतात आणि असे आचरण राक्षसी असते. "
आमच्या मनात वेदना आहेत. आपण रागावलो आहोत पण वाईटाचा नाश करण्यासाठी शक्ती दाखवावी लागेल. रावणाने आपला विचार बदलला नाही, तर दुसरा पर्याय नव्हता. रामाने त्याला सुधारण्याची संधी दिली होती आणि नंतर त्याची हत्या केली होती.
राम-रावण प्रसंगाचे दिले उदाहरण -
रावणाच्या प्रसंगाचे उदाहरण देताना भागवत म्हणाले, रावण हा शिवभक्त होता, वेद जाणत होता, पण त्याचे मन आणि बुद्धी बदलायला तयार नव्हती. अशा राक्षसाचा रामाने अंत केला, कारण बदलासाठी कधीकधी विनाश आवश्यक असतो. देश आणि धर्माच्या रक्षणासाठी राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा अंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
राक्षसांचा नाश करण्यासाठी प्रचंड शक्ती लागत असल्याने प्रत्येक नागरिकाला दु:ख आणि संताप वाटणे स्वाभाविक आहे. काही लोक चेतना आणि तर्काच्या पलीकडे असतात आणि अशा लोकांमध्ये कोणतीही सुधारणा शक्य नाही आणि केवळ कठोर कारवाई हाच त्यांचा उपाय आहे, यावरही त्यांनी भर दिला.
संबंधित बातम्या